तहसीलदार सौ. लता धोत्रे, शृंगारतळीतील गर्दीचा विचार करावा
गुहागर, ता. 02 : शृंगारतळी बाजारपेठेत रोज गर्दी असते. अनेकजण मास्कशिवाय फिरतात. सामाजिक अंतराचे भान राखले जात नाही. पोलीस, आरोग्य, महसुल, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते सर्वजणांकडून सूचना येवूनही त्या ऐकल्या जात नाहीत. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करावे. अन्यथा कारवाई करावी लागेल. अशी सूचना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांना केली. या कोणी धमकी म्हणत असेल तर दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रिया गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी दिली.
The Shringartali market is crowded every day. Many walk around without masks. Awareness of social distance is not maintained. Despite suggestions from police, health, revenue, gram panchayat, people’s representatives, social workers. they are not listened to. Therefore, I suggested the president of the trade association, The orders given by the Collector should be followed. Otherwise action will have to be taken. It is unfortunate if someone says this is a threat. Such a reaction was given by the tehsildar of Guhagar Mrs. Lata Dhotre.


शृंगारतळीतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर यांनी तहसीलदारांवर धमकी दिल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात बोलताना गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे म्हणाल्या की, निर्बंधांच्या काळात 5 हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या गावांमधील अत्यावश्यक सेवा पुरवठादारांनी घरपोच सेवा द्यावी. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शृंगारतळीच्या बाजारपेठेत तालुक्यातील विविध गावातून लोक खरेदीसाठी येतात. यापैकी अनेकजणांच्या घरात गृहविलगीकरणातील रुग्ण आहेत. अशा लोकांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असते. अनेकजण मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर राखत नाहीत. गेल्यावर्षी कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका शृंगारतळीला बसला होता. आपणच सावधानता बाळगली नाही तर कोरोनाची साथ आटोक्यात कशी येणार.
तहसीलदारांनी धमकी दिली, अजित बेलवलकर यांचे आरोप
(बातमी वाचण्यासाठी लाल रंगातील वाक्यावर क्लिक करा.)


सर्व प्रशासकीय यंत्रणांनी शृंगारतळीत वेगवेगळे उपाय करुन बघितले. एक दिवस विनाकारण फिरणाऱ्या 25 जणांच्या ॲन्टीजेन टेस्टही केल्या. त्यामध्ये 4 जण कोरोना पॉझिटिव्ह होते. तरीही लोक ऐकत नसतील तर निर्बंधांचा उपयोग काय. येथील ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्याने जनता ऐकत नाही. कडक कारवाई करा अशी विनंती पोलीस आणि प्रशासनाला करत आहे. या पार्श्र्वभुमीवर व्यापारी संघटनेचे अध्यक्षांना दुकाने बंद करुन घरपोच सेवा पुरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करावे. अशी सूचना केली. जे व्यापारी ऐकणार नाहीत त्याच्यावर कायद्याने कारवाई करावी लागेल. असेही सांगितले. याचा अर्थ बेलवलकरांनी धमकी दिल्यासारखा घेतला असेल तर नाईलाज आहे.