• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संततधार पावसामुळे यावर्षी भातपीक धोक्यात

by Ganesh Dhanawade
September 18, 2022
in Guhagar
16 1
0
Rice crop in danger due to rain
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला

गुहागर, ता.18 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पुराचे पाणी भात शेतात कायम साचून राहिल्यामुळे सद्या पोटरी वळलेले या पिकावर मोठ्या पावसाने विपरीत परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. Rice crop in danger due to rain

कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने व मेहनतीने यावर्षी शेती केली. रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे घराजवळ भात खाचरात मोठ्या प्रमाणावर भाताचे पिक घेतले आहे. त्यासाठी भाजावळी पूर्व मशागत व त्यानंतर नांगरणी साठी पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भाताची शेती केली आहे. खते व मजुरी यावर शेतकऱ्यांचे भरपूर श्रम व पैसा खर्च झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस अशीच संततधार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहनत केलेल्या शेतकऱ्यांचे या पावसाने तोंडचे पाणीच पळवळे आहे. Rice crop in danger due to rain

गुहागर तालुक्यात भाताचे ४१०० हेक्टर क्षेत्र असून या पिकाची उत्पादकता हेक्टरी 3200 क्विंटल प्रती हेक्टर आहे. त्या खालोखाल नागलीचे तालुक्यात ३९५० हेक्टर क्षेत्र असून या पिकाची उत्पादकता 3200 क्विंटल प्रती हेक्टर आहे. नागली व वरी या पिकांचे तालुक्यात प्रत्येक गावात मोठे क्षेत्र होते. परंतू, जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी रानातल्या शेतीला रामराम केला. व घराजवळील खाचरात व सखल भागात भात पिकावर जोर धरला.

यावर्षी जून महिन्यापासून आजतागायत सुमारे तीन हजार मिलिमिटर एवढा पाऊस पडला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त वाढले. भात लागवडी नंतर तिसऱ्या महिन्यात भाताच्या काड्या पोटरी वळतात. व दाणे तयार होतात. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असायला हवे. सप्टेंबरमध्ये भात खाचरात भाताच्या बुंध्यांशी कमी प्रमाणात पाणी असावे लागते. मात्र, सद्या कोसळणाऱ्या पावसामुळे भात खाचरात भात कांडया वरपर्यंत भिजताना दिसत आहेत. या अशा परिस्थितीत बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते. किडींचा प्रादुर्भाव वाढतो व तो पिकाच्या दृष्टिने हानीकारक ठरतो. Rice crop in danger due to rain

कृषी खात्याचा सल्ला

गुहागर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार अशा पावसात भात नागली व नारळ सुपारी तसेच आंबा व काजू पिकावर बुरशी जन्य रोगावरील फवारणी करू नये. कारण पावसात ही फवारणी वाया जाऊ शकते. भात खाचरात साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. खतांची मात्रा द्यावयाची असल्यास काही दिवस पाऊस थांबण्याची वाट पहावी असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. Rice crop in danger due to rain

Tags: Guhagarguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRice crop in danger due to rainUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.