• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 November 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भरकटलेल्या नौका व मच्छीमार सुरक्षित

by Mayuresh Patnakar
October 31, 2025
in Old News
218 2
0
Stranded boats and fishermen safe
428
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुक्यातील कोळीवाड्यात आनंदाचे वातावरण

गुहागर, 31 : मोंथा वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील 7 बोटींशी संपर्क तुटला होता. यामध्ये गुहागर तालुक्यातील दोन बोटी आणि सुमारे 30-40 खलाशी असल्यामुळे गुहागर तालुक्यासह करंजा, मढ, न्हावाशेवा, वर्सोवा बंदरात गेले तीन दिवस चिंतेचे वातावरण होते. तटरक्षक दल, नाविक दल, बंदर विभाग, सागरी सीमा मंच, सोसायट्यांचे पदाधिकारी आदींकडून सतत प्रयत्न सुरु होते. आज सकाळी चार बोटींशी संपर्क झाला. या बोटींवर काम करणारे खलाशी सुखरुप असल्याचे कळले आणि कोळीवाड्यातील चिंता दूर झाली. बेपत्ता बोटींशी संपर्क साधण्यासाठी तटरक्षक दल, नौदल, बंदर विभाग, सागरी सीमा मंच, सोसायट्यांचे पदाधिकारी यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु होते. Stranded boats and fishermen safe

Stranded boats and fishermen safe

गेले दोन दिवस अरबी समुद्रात मोंथा चक्री वादळामुळे गंभीर स्थिती आहे. अजुन दोन दिवस हे वादळ रहाणार आहे. वादळ येणाऱ्यापूर्वी 25 ऑक्टोबरच्या दरम्यान वर्सोवा, मढ, न्हावाशेवा, करंजा या मोठ्या बंदरांसह कोकण किनारपट्टीवरील सुमारे 20 ते 30 मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारीला गेल्या होत्या. संबंधित नौकांना वादळाचा इशारा मिळाल्यावर सुरक्षित बंदरात जाण्यासाठी या नौका निघाल्या मात्र 7 बोटींना परतीच्या प्रवासात वादळाने घेरले. 26 ऑक्टोबरला या नौकांशी संपर्क तुटल्यानंतर बंदर विभाग, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरुन कळविण्यात आले. सागरी सीमा मंचचे कार्यकर्ते, करंजा सोसायटीमधील पदाधिकारी यांनी तटरक्षक दल, नौदल, मत्स्य विभागाचे मंत्री नितेश राणे, सहाय्यक आयुक्त देवरे यांच्याशी संपर्क साधुन पाठपुरावा सुरु केला. Stranded boats and fishermen safe

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी देखील शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणांकडे पाठपुरावा करत होते. दरम्यान 29 तारखेला रात्री एका बोटीवर संपर्क साधण्यात तटरक्षक दलाला यश आले. मात्र 6 बोटींशी संपर्क होत नव्हता. नेमक्या याच बोटींवर गुहागर तालुक्यातील खलाशी होते. त्यामुळे साखरी आगर, धोपावे, वेलदूर, नवानगर येथील कोळीवाड्यातून चिंतेचे वातावरण होते.

Stranded boats and fishermen safe

सागरी सीमा मंच आणि अन्य मच्छिमार संस्थांच्या पाठपुराव्याला यश आले. 29 तारखेला रात्री 1 बोटीशी संपर्क झाला. तर 31 तारखेला दुपारी 3 च्या दरम्यान 2 बोटी करंजा बंदरात पोचल्या. उर्वरीत 2 बोटी करंजा बंदराकडे निघाल्याची माहिती मिळाली. या बोटी 31 ऑक्टोबरला रात्रीपर्यंत करंजा बंदरात पोचतील. 31 ऑक्टोबरला सकाळी 2 बोटी कुलाबा बंदराच्या दिशेने निघाल्या असून त्याही सायंकाळपर्यंत बंदरात पोचतील अशी अधिकृत माहिती आहे. सर्व बोटींवरील खलाशी सुखरुप असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला असून गुहागर तालुक्यातील कोळीवाड्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Stranded boats and fishermen safe

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStranded boats and fishermen safeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share171SendTweet107
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.