रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव चालक, 25 वर्षे विनाअपघात सेवा
गुहागर, ता.04 : राज्य परिवहन एसटी महामंडळात गेली 25 वर्षे विनाअपघात एसटी सेवा बजावणाऱ्या राज्यातील 30 कर्मचाऱ्यांचा मुंबई येथे जाहिर सत्कार करण्यात आला. यामध्ये गुहागर आगारातील चालक सुभाष कृष्णा तावडे यांचा समावेश असून, त्यांचा परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ST Driver Tawde Felicitated


एसटी ही ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित असतो हा विश्वास ग्रामीण जनतेला आहे. त्यामुळे एसटी वरील हा विश्वास अढळ राहावा. यासाठी परिवहन विभागाकडून अनेक उपाययोजना किंवा प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवते, मात्र कोरोनाच्या काळात एसटीला गेली दोन वर्षे वाईट दिवस आले. आधीच आर्थिक अडचणीत असलेली एसटी आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडली. आता यातून सावरण्याचा प्रयत्न एसटी करत आहे. राज्यात आता 100 टक्के एसटी वाहतूक सुरू झाली आहे. त्याला प्रतिसादही चांगला आहे. प्रवाशांचा एसटीवरील विश्वास कायम राहावा.यासाठी महामंडळाकडून विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा दरवर्षी सत्कार केला जातो. ST Driver Tawde Felicitated


यावेळी महामंडळाने पुण्यातील कार्यक्रमांमध्ये राज्यातील प्रत्येक विभागातून 25 वर्षे विनाअपघात सेवा दिलेल्या ज्येष्ठ चालकांची निवड केली. राज्यातून असे 30 चालक निवडण्यात आले होते. त्यामध्ये गुहागर आगारातील एसटी चालक सुभाष कृष्णा तावडे यांची निवड झाली. त्यांचा परिवहनमंत्री आणि जिल्ह्यांचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 25 हजार रोख, बॅच, शाल-श्रीफळ आणि पत्नीला साडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी रत्नागिरी एसटी विभाग नियंत्रक बोरसे व अन्य अधिकारी उपस्थित होते. ST Driver Tawde Felicitated

