डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजावरील प्रभाव आणि वर्तमान स्थिती
रत्नागिरी ता. 11 : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने समता साप्ताह निमित्त प्रा. तुळशीदास रोकडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान डॉ. आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा समाजावरील प्रभाव आणि वर्तमान स्थिती या विषयावर आयोजित केले होते. Rokade’s lecture in Ratnagiri


विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने समता साप्ताह निमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. रोकडे म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक चिंतन मूलगामी स्वरूपाचे असून अज्ञानामुळे व्यक्तीचे तर नुकसान होतेच. त्याच बरोबर समाजाचेही नुकसान होते यातून बाहेर पडण्याचा मार्ग शिक्षण असून त्यासाठी संविधानात्मक तरतुदीच्या सुयोग्य अंमल बजावनीची आवश्यकता आहे. मानवी मूल्ये स्वीकारलेल्या स्वाभिमानी समाज निर्मितीचे कार्य शैक्षणिक चळवळीने पार पाडावे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा पार पडण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर असून या कार्यात त्या जेवढ्या लवकर यशस्वी होतील तेवढा भारत खऱ्या अर्थाने साक्षर आणि स्वावलंबी बनेल असा विश्वास रोकडे यांनी व्यक्त केला. Rokade’s lecture in Ratnagiri
मुंबई सदर कार्यक्रमास उप केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. किशोर सुखटणकर यांनी वर्तमान शिक्षणाचा आढावा घेत असताना मुंबई विद्यापीठ त्या दृष्टीने करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. Rokade’s lecture in Ratnagiri


विविध अभ्यासक्रमाच्या निर्मितीतून आणि अंमल बजावणीतून उपकेंद्र डॉ. आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) अभिप्रेत शिक्षणाचा प्रसार कशा पद्धतीने करू पाहते याचीही चर्चा केली. फुले – आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून या जयंती निमित्त आपण त्यासाठी कटीबद्ध राहू यात अशी अपेक्षा व्यक्त केली. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्य क्रमाचे सूत्र संचालन साक्षी चाळके यांनी केले तर आभार अश्विनी पावसकर यांनी मानले . कार्यक्रमास स्व. धनंजय कीर यांचे सुपुत्र डॉ. सुमीत किर, डॉ. उप केंद्राचे रजिस्टार श्री. बोरगावे व विविध विद्याशाखांचे विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते. Rokade’s lecture in Ratnagiri