जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील ; रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
रत्नागिरी, दि. 17 : रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृहे ही दररोज रात्री 12.00 वाजेपर्यत 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी डॉ. बी.एन.पाटील यांनी परवानगी देणारे आदेश जारी केले आहेत. Revised Orders Regarding Restaurants


राज्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा1897 ची, आपत्ती व्यवस्थापन कायदयाची अंमलबजावणी सुरू आहे. कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत व करावयाच्या उपाययोजनेबाबत दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आता विविध आस्थापना पुन्हा सुरू करण्याची आणि काम करण्याची परवानगी दिली आहे. Revised Orders Regarding Restaurants
तथापि, कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेळेच नियमन व नियमांचे काटेकोर पालन ,नागरिकांचे पूर्ण लसीकरण करण्याची आवश्यकता, व्यापारावर निर्बध शिथिल करण्यात आले आहेत. शासनाच्या 31 जानेवारी 2022 व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 01 फेब्रुवारी 2022 अन्वये रत्नागिरी जिल्हयात कोव्हीड-19 निर्बधाबाबत शिथिलता आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. Revised Orders Regarding Restaurants
01 फेब्रुवारी 2022 रोजीच्या आदेशात रत्नागिरी जिल्हयातील रेस्टॉरंटस व उपहारगृहे दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील असे आदेश करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिऐशन यांनी नव्याने सुरू होणारी पर्यटन स्थळे, शाळा ,व्यापर यांचा विचार करता हॉटेलसाठी रात्री 10 पर्यतची वेळ ही गैरसोयीची आहे. Revised Orders Regarding Restaurants
सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये येणारे ग्राहक हे रात्री 9 नंतर हॉटेलमध्ये यायला सुरूवात होते मात्र 10 नंतर सुरू होणा-या पोलीस बंदोबस्ताला घाबरून सध्या हॉटेलमध्ये येणे ग्राहक टाळत आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. हॉटेल व्यावसायिकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. तसेच ग्राहकांची देखील गैरसोय होत आहे. रत्नागिरी जिल्हयातील हॉटेल्स रात्री बंद करण्याची वेळ ही रात्री 11 नंतरची केली जावी अशी विनंती केली आहे. Revised Orders Regarding Restaurants त्यानुसार रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन यांचे निवेदन व शासनाकडील 31 जानेवारी 2022 मधील 3.d मध्ये Restaurants, Theaters,Natyagrihas may remain operational as per timing to be decided by DDMA with 50% capacity असे नमूद केले आहे. त्यानुसार डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंटस् आणि उपहारगृहाच्या ठिकाणी अभ्यागतांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची अभ्यागतांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक राहील, दररोज घरपोच सेवेस परवानगी राहील, या अटी व शर्तीसोबतच 01 फेब्रुवारी 2022 अन्वये निर्गमित केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृहे ही दररोज रात्री 12.00 वाजेपर्यत 50% क्षमतेनेच सुरू ठेवण्यास या आदेशाव्दारे परवानगी देण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. Revised Orders Regarding Restaurants