डॉ. यशवंत पाटणे, बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाचे प्रकाशन
गुहागर, ता. 25 : ओघळलेल्या मोत्यानंतरचा बाईपणाच्या उंबरठ्यावर हा कथा संग्रह म्हणजे घडवलेले मोती आहे. यातील कथा पिढ्यानपिढ्या वेदनांचे ओझे वहाणाऱ्या, वादळाशी संसार करणाऱ्या, वेगळ्या वाट्या चालणाऱ्या स्त्रीयांच्या आहेत. या कथांना विदारक वास्तवाची बैठक आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, सातारा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले. ते बाईपणाच्या उंबरठ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. Publication of a book on the threshold of femininity


गुहागरमधील प्रा. सौ. मनाली बावधनकर यांच्या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयांमध्ये झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाटणे, निलम माणगावे सांगली, समाजकल्याण साताराचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, मसाप शाखा गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या हस्ते बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाचे प्रकाशन झाले. क्रांतीस्मृती ग्रुप, मसाप शाखा गुहागर आणि ज्ञानरश्मी वाचनालयाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. Publication of a book on the threshold of femininity
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. सौ. मनाली बावधनकर म्हणाऱ्या की, ज्या नगरवाचनालयात वडिलांचा हात धरुन लहानपणी येत होते त्याच नगरवाचनालयात आज माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे याचा वेगळा आनंद आहे. नीलमताईंनी पुस्तकाचे बारसे करतं बाईपणाच्या उंबरठ्यावर हे नाव ठेवले. हे नाव इतके चपखल आहे की पुस्तकांत काय दडलयं ते सांगून जाते. या पुस्तकातील नायिका आणि कथानक माझ्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या महिलांमध्ये मी पाहिलेलं आहे. Publication of a book on the threshold of femininity
कथासंग्रहाचे अंतरंग उलगडून दाखविताना राष्ट्रपाल सावंत म्हणाले की, स्वतंत्र विचार करणाऱ्या नायिका परिस्थितीशी झगडून, स्वत:ला सिध्द करतात. व्यवहारातील साध्या सोप्या भाषेत मांडणी असली तरी प्रत्येक कथा उत्कंठावर्धक आहे.
साहित्यिका नीलम माणगावे म्हणाल्या की, मनालीच्या कथा वाचनीय आहे. त्या कथा काहीतरी सांगु पहात आहेत. नवा विचार देणाऱ्या, वास्तव सांगू पहाणाऱ्या, परिवर्तनाची दिशा दाखविणाऱ्या आहेत. पुस्तकाचे नाव आणि मुखपृष्ठ इथं पासून हा विचार सुरू होतो. कथा वाचताना लेखिकेचा हा पहिलाच कथासंग्रह आहे हे खरे वाटत नाही. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे म्हणाले की, या कथासंग्रहामुळे मनालीताईंकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसा या लेखिकेचा हात या पुस्तकांतून दिसतो. एकाच पुस्तकात बंडखोर, परंपरावादी, भक्ती करणारी, नवी वाट शोधणाऱी, प्रेम करणारी अशा अनेक नायिका पहायला मिळतात. Publication of a book on the threshold of femininity
या प्रकाशन सोहळ्यात सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे क्रांतिस्मृती ग्रुपच्या सौ. वृंदा फरांदे, सौ. संगिता हेंद्रे, सौ. वैजयंती कुलकर्णी, उपप्राचार्य कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुहागर न.प.चे नगरसेवक संजय मालप यांच्यासह राजू खाडे, राजन बाचल, अरविंद बाचल, व्होरा सर, भिंगारदिवे सर, थोरात सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कथासंग्रह आईवडिलांना समर्पित
लेखिका सौ. बावधनकर यांनी आईवडिलांना समर्पित केला आहे. आजच्या प्रकाशन सोहळ्याला अविनाश बाचल व सौ. अलका बाचल उपस्थित होते. हे लक्षात आल्यावर प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. पाटणे यांनी सौ. मनाली यांचे आईवडिलांना व्यासपीठावर बोलावून घेतले आणि प्रकाशित झालेले पुस्तक त्यांच्या हातात दिले. Publication of a book on the threshold of femininity