अवघ्या 12 तासांत शोध लावण्यात गुहागर पोलिसांना यश
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल आरमारकर मोहल्ला येथील 2 महिला, 17 वर्ष, 13 वर्ष आणि 11 वर्षांच्या 3 अल्पवयीन मुली आणि 9 वर्ष, 6 वर्ष, 1 वर्ष आणि 1 महिन्याचे 1 बाळ अशी 4 मुले शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता (Missing) झाली होती. रात्रीपर्यंत यापैकी कोणीही घरी परत न आल्याने आरमारकर मोहल्ल्यात प्रचंड घबराटीचे वातावरण होते. शुक्रवारी रात्री 12 वा. च्या दरम्यान सौ. महालदार गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानंतर अवघ्या 12 तासांत, शनिवारी दुपारपर्यंत सर्वांना शोधण्यात गुहागर पोलीसांना यश आले. ( Police succeeded in finding 9 missing persons ) या संपूर्ण घटनेमागे नेमके काय दडले आहे याची चौकशी ही पोलीस पथक त्यांना घेवून गुहागरला आल्यावर केली जाईल. Police succeeded in finding 9 missing persons


काय घडले?
5 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अंजनवेल आरमारकर मोहल्ल्यातील अफिया सुलतान अन्सारी व अरविना सुफियार पांजरी या दोन महिला स्वत:च्या प्रत्येकी दोन मुलांसह (मुलांची वये 9 वर्ष, 6 वर्ष, 1 वर्ष आणि 1 महिन्याचे 1 बाळ) आपल्यासोबत 17 वर्ष, 13 वर्ष आणि 11 वर्षांच्या 3 अल्पवयीन मुलींना घेवून बाहेर पडल्या. घरातून बाहेर पडताना त्यांनी अंजनवेल मध्ये डॉक्टरांकडे जावून येतो असे सांगितले होते. त्यामुळे कोणालाच संशय आला नाही. या दोन महिलांनी आपल्यासोबत आरमारक मोहल्ल्यातील तीन अल्पवयीन मुलींनाही घेतले होते. कदाचित 4 लहान मुले सोबत असल्याने त्यांना सांभाळायला कोणीतरी हवे म्हणून या मुली त्यांच्यासोबत गेल्या असतील असे गृहित धरले गेले. मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत या महिला, मुले आणि अल्पवयीन मुलींसह परत आल्या नाहीत. त्यामुळे मोहल्ल्यात घबराट निर्माण झाली. गोंधळ निर्माण झाला. Police succeeded in finding 9 missing persons
शोध सुरू
ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पालथा घातला. अंजनवेल बोरभाटले, कातळवाडी परिसरात युसूफ मेहरअली ट्रस्टचे रुग्णालय आहे. तिथपर्यंत नातेवाईक पोचले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी अशा कोणी महिला मुलांसह इथे आल्याच नाहीत असे सांगितले. नातेवाईकांनी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाचाच संपर्क होत नव्हता. आजुबाजुच्या गावात अन्य नातेवाईकांकडे ही मंडळी गेली असावीत असे समजून शोध घेण्यात आला. मात्र तेथुनही नकार मिळाला. अखेरीस आरमारकर मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी रात्री गुहागर पोलीस ठाणे गाठले. सौ. गजाला महालदार यांनी गुहागर पोलीस ठाण्यात 9 जण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. Police succeeded in finding 9 missing persons


अपहरणाचा गुन्हा दाखल
सौ. गजाला महालदार यांच्या फिर्यादीवरुन गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. कायद्यानुसार अल्पवयीन मुल एकटे पळून गेले तरी सदर मुलाचे अपहरण (Kidnaping) झाल्याचा गुन्हा नोंदवला जातो. सदर घटनेत 2 महिला स्वत:च्या 4 मुलांसह 3 अल्पवयीन मुलींबरोबर बेपत्ता झाल्या होत्या. तरीही अफिया सुलताना अन्सारी व अरविना सुफियार पांजरी यांच्यावर 3 अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचा गुन्हा कायद्यानुसार दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाने वेगवान तपास
तातडीने ही बाब वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात आली. पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग (Dr. Mohitkumar Garg, Superintendent of Police, Ratnagiri) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी (DYSP Sachin Bari) यांनी गुहागरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक तुषार पाचपुते यांच्याबरोबर चर्चा केली. तपासाची दिशा ठरली. लागलीच सपोनि पाचपुते यांनी गुहागर पोलीस ठाण्यातील 2 अधिकारी आणि 8 अंमलदार यांची 4 पथके तयार केली. ही पथके दापोली, दाभोळ, चिपळूण आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रत्नागिरी येथील पोलीस मुख्यालयातून तांत्रिक कार्यवाही सुरु झाली. दरम्यानच्या काळात रात्री 2.30 वाजता बेपत्ता झालेल्यांपैकी एकाचा संपर्क झाला. मात्र संबंधित व्यक्तीने काहीही न बोलता फोन पुन्हा बंद केला. या तांत्रिक माहितीच्या आधारे सदर अफिया सुलताना अन्सारी व अरविना सुफियार पांजरी आपल्या 4 बालकांनासह 3 अल्पवयीन मुलींना सोबत घेवून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे कळले. ही बाब मुंबईकडे (Mumbai) रवाना झालेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्यापर्यंत पोचविण्यात आली. त्याचप्रमाणे अंतर्गत यंत्रणेद्वारे मुंबई मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच रेल्वे पोलीस (Railway Police) दलापर्यंत ही बेपत्ता झालेल्या सर्वांची तपशीलवार माहिती पाठविण्यात आली. Police succeeded in finding 9 missing persons
अखेर शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान गुहागर पोलीसांनी 2 महिलांना त्यांच्या मुलांसह व 3 अल्पवयीन मुलींना दादर (Dadar) येथुन सुखरुप ताब्यात घेतले आहे. या सर्वांना घेवून पोलीसांचे पथक गुहागरला शनिवारी रात्री पोचले. आता या घटनेचा अधिक तपास अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत. यामध्ये या महिलांचा नेमका उद्देश काय होता. त्यांनी अपहरण केले की अन्य काही कारणांमुळे या महिलांना असे कृत्य करणे भाग पडले. आदी प्रश्र्नांची उकल चौकशी दरम्यान होईल. या संपूर्ण तपास प्रक्रियेमध्ये गुहागरचे पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हनुमंत नलावडे, राजेश धनावडे, वैभव ओहोळ, टॅबचे रमिझ शेख यांचा सहभाग होता. Police succeeded in finding 9 missing persons