मनसेचे तहसीलदारांना निवेदन
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील मौजे गिमवी येथे देवघर, रामाणेवाडी तर्फे कौंढर काळसूर या गावांसाठी असलेली तलाठी सजेची इमारत जीर्ण झाली आहे. सदर इमारतीचे त्वरित दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारत बांधावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दिले. MNS statement to Tehsildars


निवेदनात म्हटले आहे की, सन २००६ साली तलाठी सजेची इमारत बांधण्यात आली होती. परंतु या इमारतीची सद्यस्थितीमध्ये दुरवस्था झाली असून सदरची इमारत सध्या बंद स्थितीत आहे. परिणामी हे कार्यालय गिमवी येथील एका ग्रामस्थांच्या घरातच थाटले गेले आहे. अशा गंभीर बाबीची आपणाकडून अद्याप दखल घेतली गेलेली दिसत नाही. ही सदरची इमारत मोडकळीस आलेली दिसत आहे. तरी या इमारतीची पुन्हा दुरुस्ती किंवा नवीन इमारत तयार करून या ठिकाणी तलाठी सजेचे कामकाज सुरू करावी व जनतेला दिलासा द्यावा, तरी सदर इमारतीची पाहणी करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी. MNS statement to Tehsildars
यावेळी निवेदन देताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सुनील मुकनाक, मनसेचे सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी, कौंढर काळसूर शाखाध्यक्ष सचिन जोयशी व मनसे सैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. MNS statement to Tehsildars