जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील
रत्नागिरी दि. 09 : परशुराम घाटात दरड कोसळून हानी होवू नये, दरडीचा धोका राहू नये. यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी उर्वरित बाजूनेही तात्काळ संरक्षण भिंत उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावले उचलावीत व प्रस्ताव सादर करुन तत्काळ काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी दिले. याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पेढे-परशुराम येथील गावकरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. Mechanism for Parashuram Ghat security


या ठिकाणी काही घरांवर दरड कोसळण्याचा धोका आहे, असे नागरिकांचे म्हणणे होते. त्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी प्रसंगी स्थलांतरीत करण्यात यावे, याबाबतही यावेळी चर्चा झाली. घाटाच्या आतापर्यंत झालेल्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. घाटाच्या एका बाजूने संरक्षण भिंत बांधून झाली आहे. दुसऱ्या बाजूनेही अशी भिंत उभारणी आवश्यक असल्याचे सांगून याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ काम सुरु करावे असे जिल्हाधिकारी म्हणाले. पावसाच्या काळात वाहनांवर दरड कोसळून अपघात होवू शकतो. अशावेळी काही काळ वाहतूक थांबविण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली. Mechanism for Parashuram Ghat security