• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शैक्षणिक वर्षात बदल करू नका- सागर पाटील

by Guhagar News
March 29, 2022
in Bharat
17 1
0
मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 :  मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर राज्यातील बहुतांशी शाळा सकाळ सत्रात सुरू केल्या जातात. या कालावधीत वाढते तापमान आणि अनेक प्रदेशांमध्ये असणारी पाण्याची कमतरता यामुळे सकाळ सत्रात शैक्षणिक कामकाज पूर्ण करणे अपेक्षित असते. परंतु राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक फतवा काढला असून यानुसार  एप्रिल  महिन्याच्या अखेरपर्यंत दिवसभर शाळा सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा अजब आदेश काढण्यापूर्वी शासनाने बाल मानसशास्त्राचा अभ्यास केला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Changes in Academic Years

उन्हाळ्याची तीव्रता व कोरोना काळात विद्यार्थ्यांवर झालेले प्रतिकूल परिणाम याचा विचार करता दिवसभर शाळा घेण्याचा निर्णय अयोग्य असून मार्च 2020 पासून शिक्षक व कर्मचारी कोरोना योध्दा म्हणून काम केले आहे. त्यामुळे किमान यावर्षी तरी शिक्षकांना आपल्या गावी जाता आले पाहिजे. त्यामुळे शासनाने हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने शासनाकडे केली असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले. Changes in Academic Years

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या शासन निर्णयानुसार  एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पहिली ते नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. विशेष बाब म्हणजे शनिवारी देखील पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्याबाबत तसेच रविवारी ऐच्छिक स्वरुपात  शाळा  सुरू  ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. वास्तविकपणे प्रतिवर्षी मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा सकाळ सत्रा मध्ये सुरू होतात. राज्याच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणारी उन्हाची तीव्रता व पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात सुरू ठेवणे उचित असल्याचे बोलले जात आहे. शालेय विद्यार्थ्यांचे वय व कोरोना काळात त्यांच्यावर झालेले प्रतिकूल परिणाम लक्षात घेता घड्याळी सहा ते सात तास शाळेमध्ये थांबणे विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्टय़ा शक्य नसल्याचे बोलले जात आहे. Changes in Academic Years

school

राज्य शासनाने हा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्राची विचार केला आहे की नाही असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे . यावर्षी उष्णतेचे प्रमाणही प्रतिवर्षी च्या तुलनेत अधिक असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. या पाश्र्वभूमीवर शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे. Changes in Academic Years

मे महिन्याची सुट्टी आवश्यक

मार्च 2020 पासून राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये शालेय कामकाज सुरू नव्हते. या काळामध्ये सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक कोरोना योद्धा म्हणून पूर्णवेळ कार्यरत होते. गेली दोन वर्षांपासून शिक्षक आपल्या गावीदेखील गेलेले नाहीत. शिक्षकांनी कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद शासन स्तरावर आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांनाही मे महिन्यात शाळेत बोलावणे उचित ठरणार नाही. यामुळे यावर्षी मे महिन्याची सुट्टी विद्यार्थी व शिक्षकांसाठी अवश्यक आहे. शैक्षणिक वर्षामध्ये कोणताही बदल न करता प्रतिवर्षाप्रमाणे शैक्षणिक कामकाज चालविण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने करण्यात येत आहे . Changes in Academic Years

Tags: Changes in Academic YearsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.