१२५ सायकलपट्टूंचा सहभाग : प्रमाणपत्राचे वितरण
रत्नागिरी, ता.10 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या युवा एवं खेळ मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र रत्नागिरी तर्फे आयकॉनिक रत्नागिरीत 8 जून रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसीचे छात्र, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य, आणि जिल्ह्यातील अन्य रहिवासी अशा सुमारे १२५ हून अधिक सायकलस्वारांनी फेरीत भाग घेतला. Bicycle ferry by Nehru Youth Center


जागतिक सायकल दिनासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील चार जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आयकॉनिक स्थान म्हणून घोषित केला होता. यात नेहरू युवा केंद्र रत्नागिरी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ते टिळक जन्मस्थान पर्यंत या सायकल फेरीचे आयोजन केले गेले होते. 8 वाजता क्रीडांगणावरून निघालेल्या या फेरीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी झेंडा दाखवला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तिरंगी झेंड्याच्या तीन रंगांचे प्रतिक म्हणून २५ फुगे सायकल फेरीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी आकाशात सोडले. Bicycle ferry by Nehru Youth Center


या सायकल फेरीमध्ये सायकल चालवा आणि निरोगी राहा असा संदेश प्रसारित करण्यात आला. टिळक जन्मस्थानी नेहरू युवा केंद्र संगठनाचे महाराष्ट्राचे मा.राज्य निर्देशक, श्री. प्रकाश कुमार मनुरे यांच्या हस्ते टिळकांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सायकलस्वारांना टी-शर्ट, टोपी, अल्पोपहार व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या सायकल फेरीसाठी गुगल फॉर्म द्वारे सायकल स्वारांची पूर्व नावनोंदणी केली गेली. Bicycle ferry by Nehru Youth Center


या कार्यक्रमात नेहरू युवा केंद्र संगठनाचे महाराष्ट्राचे मा.राज्य निर्देशक, श्री. प्रकाश कुमार मनुरे, रत्नागिरीचे मा.जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरडवेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन नेहरू युवा केंद्र रत्नागिरीचे जिल्हा युवा अधिकारी श्री.मोहित कुमार सैनी यांनी केले. याच सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी, पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाचा सहयोगाने हा कार्यक्रम संपन्न झाला. Bicycle ferry by Nehru Youth Center


जिल्हधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, रत्नागिरीत अनेक सायकलपट्टू आहेत. शासनाने खेलो इंडिया फिट इंडिया अभियान राबवले आहे. प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास व्यायाम करून तंदुरुस्त राहावे. त्यामुळे कोणत्याही औषधांचीही गरज लागणार नाही. व्यायामामुळे घाम आल्याने लठ्ठपणा दूर होता, मानसिक शांती मिळते. सायकल चालवल्यामुळे प्रदूषण होत नाही व तब्बेतही चांगली राहते. कार्यालयात किंवा जवळ जाताना सायकल चालवावी. हि सायकल फेरी क्रीडांगणाच्या मागील रस्त्याने गजानन महाराज मंदिर, पॉवरहाऊस मार्गे मुख्य रस्त्यावरून मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, एसटी स्टँडमार्गे आठवडा बाजार, ८० फुटी हायवे, नाईक फिशरीजजवळून झाडगावातील श्री भैरी मंदिर, खालची आळी, काँग्रेस भवनमार्गे टिळक आळीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारकापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली. Bicycle ferry by Nehru Youth Center

