• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाच राज्यातील निवडणुकीचा बिगुल वाजला

by Mayuresh Patnakar
February 26, 2021
in Old News
16 1
0
पाच राज्यातील निवडणुकीचा बिगुल वाजला
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

27 मार्चला मतदानाचा पहिला टप्पा, 2 मे होणार मतमोजणी

गुहागर, ता. 26 : देशातील पश्चिम बंगाल, आसम, केरळ, तामिलनाडु या चार राज्यात आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election 2021)  होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. सर्व राज्यातील मतमोजणी 2 मे ला होईल. पाचही राज्यात आजपासून आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाने (Election Commission) आज पत्रकार परिषदेत दिली.
केरळ (Kerala), तामिळनाडु (Tamilnadu) आणि पदुचेरी (Pondicherry) राज्यात 6 एप्रिलला मतदान होणार आहे. आसाम (ASAM) मध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल असे तिन टप्प्यात मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये 8 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व राज्यातील निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागतील.
तामिळनाडू विधानसभेत 234 जागा आहेत. केरळ राज्यात विधानसभेच्या 141 जागा आहेत. त्यापैकी 140 लोकप्रतिनिधींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. 1 जागा राष्ट्रपती निवडतात. आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणुक होणार आहे.
केंद्रशासीत असलेल्या पदुचेरीमध्ये विधानसभेच्या 33 जागा आहेत. येथील काँग्रेस सरकारचा कार्यकाळ जुन 2021 मध्ये संपणार होता. मात्र त्याआधीच येथील सरकारवर अविश्र्वास ठराव दाखल करण्यात आला. या ठरावावर मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुका होवून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदुचेरीमध्ये राष्ट्रपती शासन लागु करण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये विधानसभेच्या (Assembly) एकूण 294 जागा आहेत. 30 मे रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (तृणमुल काँग्रेस, TMC) यांचा कार्यकाळ संपत आहे. भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये गेले दोन महिने धुमश्चक्री सुरु आहे. पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार आदी घटनांमुळे वातावरण तापले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला आहे. या ठिकाणी 27 मार्च, 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 अप्रैल, 29 एप्रिल) अशा 8 टप्प्यात मतदान होणार आहे.
मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) संकटामुळे बिहारमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली होती. त्याचप्रमाणे या पाचही राज्यात मतदान केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाल्याने बिहार पेक्षाही जास्त मतदान या पाच राज्यात होईल. त्यामुळे मतदानाची वेळ देखील 1 तासाने वाढविण्यात येणार आहे.

Tags: Assembly ElectionCoronavirus PandemicElection CommissionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiWest Bengalआसमकेरळकोरोना महामारीटॉप न्युजताज्या बातम्यातामिलनाडुपश्चिम बंगालपुदुचेरीमराठी बातम्यालोकल न्युजविधानसभा निवडणुका
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.