रत्नागिरीत १३१ व्या जयंतीनिमित्त जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप
गुहागर, ता. 15 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण व अभिवादन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. Ambedkar Jayanti in Ratnagiri


महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेला समानतेचा संदेश, सर्वधर्म समभावाचा त्यांचे विचार पुढे नेऊ या असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केले. यावेळी ज्योत्स्ना पडीयार अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रत्नागरी, संतोष चिकणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रत्नागिरी हे मान्यवर उपस्थित होते. Ambedkar Jayanti in Ratnagiri


जिल्हाधिकारी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसाद करुन प्रगती साधल्यास वैयक्तिक प्रगतीबरोबर समाजाचीही प्रगती साधणे शक्य आहे. यश, प्रगती साधताना त्यांचा आदर्श घेवू या. एखाद्या गोष्टीचा आपण कसा विचार करतोय यावर त्या गोष्टीचे यश अवलबून असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला समानतेचा दिलेला संदेश, विचार आपण पुढे नेऊ या असे ते म्हणाले. Ambedkar Jayanti in Ratnagiri


कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रकाश नाईक, बाबासाहेब पाटील महाविद्यालय, सरुड यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचे जिवनावर प्रकाश टाकणारे व्याख्यान केले. बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठीच नाहीत तर समस्त मानव जातीसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजनैतिक इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केल्याचे स्पष्टीकरणात्मक प्रसंग देऊन मत मांडले. तसेच शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. Ambedkar Jayanti in Ratnagiri
कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून करण्यात आले.