समुद्रात मासेमारीस न जाण्याचे आवाहन
गुहागर, ता. 08 : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी भागांत ८ जूनपासून विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याच्या वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही वातावरणीय स्थिती कोकण किनारपट्टी भागात आणखीन दोन दिवस कायम राहणार आहे. Storm warning

हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारपासून किनारी भागात ६० कि. मी. वेगापर्यंतचे वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांनी दि. ८ ते १० जून या कालावधीत समुद्रात मासेमारीस जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. किनारी भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. Storm warning
