रत्नागिरीतील 7 मुलांना केंद्रीय मंत्री दानवे पाटील यांच्या हस्ते वाटप
रत्नागिरी, दि. 31 : कोविड मुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांशी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 अनाथ बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या सुमारे 9 आहे.


दृकश्राव्य माध्यमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील अनाथ बालकांशी संवाद साधला. तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान द्या, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. The Center assisted the orphans
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री दानवे यांच्या हस्ते जिल्हातील 7 बालकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. The Center assisted the orphans


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी बालकांशी संवाद साधला. मुलांना त्यांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमेबाबत माहिती दिली. आस्थापूर्वक पालकांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष करून मला रत्नागिरीला पाठवल्याचे सांगितले. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सारा देश तुमच्या पाठीशी आहे. असेही दानवे यांनी सांगितले. The Center assisted the orphans
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील, अध्यक्ष बाल न्याय मंडळ निखील गोसावी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर आदी उपस्थित होते. The Center assisted the orphans