आदिती नागवेकर हिला प्रथम आणि चौथे उत्तेजनार्थ बक्षीस
रत्नागिरी, ता. 26 : हातिसमध्ये कल्पवृक्षाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती संदेश नागवेकर (हातिस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तोणदेच्या पूर्वा आग्रे यांनी द्वितीय, व मनिषा कीर (हातिस) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. हातिस ग्रामविकास मंडळाने शासनाच्या मदतीने नारळ बागायदारांचा मेळावा आयोजीत केला होता. त्यानिमित्ताने खाद्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Competition at Hatis


हातिस ग्रामविकास मंडळ (हातिस व मुंबई), दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University), कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि भारत अॅग्रो सर्व्हिसेस (कोल्हापूर) (Bharat Agro Services Kolhapur) यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन केले होते. Competition at Hatis
कल्पवृक्षाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत हातिस, तोणदे, टेंभ्ये परिसरातील ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. हातिस येथे पीर बाबरशेख मंदिराच्या परिसरात ही स्पर्धा झाली. त्यामध्ये पहिले चार क्रमांक निवडण्यात आले. यामध्ये आदिती संदेश नागवेकर (हातिस) यांना नारळ बिस्कीट या पदार्थास पहिले बक्षीस मिळाले. तोणदेच्या पूर्वा आग्रे यांच्या खोबऱ्याच्या पोळीला दुसरा क्रमांक, मनिषा कीर (हातिस) यांच्या मठका कढीला तिसरा क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस आदिती नागवेकर यांच्या खोबऱ्याच्या आंबावडीला मिळाला. Competition at Hatis


डॉ. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी सभापती कुमार शेटये, मरिनर दिलीप भाटकर, पंचायत समिती रत्नागिरी माजी सदस्य महेंद्र झापडेकर, सरपंच कांचन नागवेकर, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर आणि मुंबईचे अध्यक्ष शंतनू नागवेकर यांच्या हस्ते विजेत्यांना अनुक्रमे 1750, 500 व 250 रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. Competition at Hatis
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुषमा दिवेकर, गृहिणी आणि प्राध्यापक डॉ. आसिफ पागारकर आणि मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हातिस ग्रामविकास मंडळ हातिस आणि मुंबई आणि हातिस ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. Competition at Hatis