महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मिळणार अनुदान
गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यात गेली 10 वर्ष फळबाग लागवडीचा शासनाकडून आग्रह होत आहे. या योजनेत सुपारी पिकाचाही अंतर्भाव आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारीद्रय रेषेखालील शेतकरी तसेच भू सुधार योजना, इंदिरा आवास योजना आणि कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार 0.10 हे ते 2.00 हेक्टर पर्यंत जमीन असलेले (जमीन मालक किंवा कुळ) शेतकरी यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. केंद्र शासनाकडून या योजनेतील लाभार्थींना 100 टक्के अनुदान देण्यात येत आहे. Inclusion of betel nut in orchard scheme


फळबाग लागवड योजनेमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि चिकु या झाडांचा समावेश आहे. प्रत्येक पिकाप्रमाणे हेक्टरी किती लागवड करावी हे निश्चित करण्यात आले आहे. आंबा आणि चिकु हेक्टरी 100 झाडे, काजू 200, नारळ 150 तर सुपारीची 1 हेक्टरमध्ये 1370 रोपांची लागवड लाभार्थी करु शकतो. Inclusion of betel nut in orchard scheme


या योजनेचा लाभ 5 गुंठे ते 2 हेक्टर जमीन असलेल्यांनाच मिळणार आहे. लाभार्थ्याने विहित नमुन्यामध्ये ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे. त्यासाठी 1 जून ते 31 डिसेंबर अशी तब्बल 7 महिन्यांची कालमर्यादा आहे. ग्रामसभेची मंजूरी मिळाल्यानंतरच लाभार्थ्याची निवड निश्चित होईल. प्रत्येक लाभार्थ्यांने जॉब कार्ड काढणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत कामे जॉब कार्डधारक मजुराकडून करुन घ्यायची आहे. त्यांनाच मनरेगाची मंजूरी मिळू शकते. फळबाग लागवडीचे संवर्धन आणि जोपासना करण्याची जबाबदारी लाभार्थ्याची असेल. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी फळबाग रोपे जिवंत असण्याची शासनाने ठरवून दिलेली टक्केवारी राखावी लागेल. तरच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे अनुदान मिळू शकते. Inclusion of betel nut in orchard scheme