• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पर्यावरण रक्षणासाठी लोक चळवळ उभारा

by Guhagar News
May 10, 2022
in Bharat
16 0
0
Built people's movement for environmental protection
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपराष्ट्रपती नायडू ; हवामान विषयक कृती करण्यात भारताची आघाडी

मुंबई, ता. 10 : हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम धोरणांच्या बरोबरीने जनतेने सामूहिक कृती करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज केले. पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे असे ते म्हणाले. Built people’s movement for environmental protection

घटती जैवविविधता आणि वातावरणात वाढत्या प्रमाणातील घडत असलेल्या गंभीर घटना यांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्यपूर्ण आत्मपरीक्षण आणि खंबीर कृती करण्याचे आवाहन करत नायडू म्हणाले, “आपला हा ग्रह वाचविणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर हे प्रत्येक नागरिकाचे आणि पृथ्वीवरील प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.”

मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात पर्यावरणीय विविधता आणि पर्यावरणीय न्यायशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपती बोलत होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हवामानविषयक कृती करण्यात भारत नेहमीच जगात आघाडीवर असतो यावर भर दिला. ग्लासगो येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉप 26 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेली महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. Built people’s movement for environmental protection

लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनशैलीच्या निवडीमुळे निर्माण होणारी कार्बन आणि पर्यावरणीय पदचिन्हे यांची जाणीव करून द्यायला हवी. पालक आणि शिक्षकांनी मुलांना त्यांच्या सभोवतालच्या भौतिक वातावरणासारखीच त्यांच्या नैसर्गिक  #environment  ची- त्यांच्या अवतीभवती असलेल्या पशु-पक्षी जगताची काळजी घेण्याची शिकवण द्यायला हवी.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणीय न्यायाची बाजू राखल्याबद्दल भारताच्या सर्वोच्च कायदाव्यवस्थेचे कौतुक करून उपराष्ट्रपती म्हणाले, “निम्न स्तरावरील न्यायालयांनी देखील पर्यावरणकेन्द्री दृष्टीकोन स्वीकारायला हवा आणि त्यांच्या न्यायदानात स्थानिक जनता आणि जैवविविधता यांचे हितरक्षण होईल याची काळजी घ्यावी.” पर्यावरण विषयक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई आणि ‘प्रदूषण करणाऱ्याने  त्याची किंमत चुकवावायला हवी ’ या तत्वाची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे असे ते म्हणाले. Built people’s movement for environmental protection

चंदीगड विद्यापीठात पर्यावरणीय विविधता आणि पर्यावरणीय न्यायतत्वशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज उद्घाटन करताना उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू. त्यावेळी निसर्गाचे शोषण करण्याची विघातक पद्धत मोडीत काढण्याच्या गरजेवर भर देत नायडू यांनी परिस्थितीची दखल घेऊन ‘पर्यावरण आणि अर्थव्यवस्था’ यांच्यात उत्तम समतोल राखला जाईल अशा पद्धतीचे कायदे तयार करण्याचे आवाहन त्यांनी कायदेतज्ञांना केले. Built people’s movement for environmental protection

Tags: Built people's movement for environmental protectionEnvironmentGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.