गुहागर, ता. 30 : रत्नागिरीत दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या कालखंडानंतर प्रथमच भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि त्यांच्या पालकांचा स्नेहमेळावा मंगळवारी उत्साहात साजरा झाला. Snehamelava at Agashe Vidyamandira


या वेळी विद्यार्थ्यांनी गीत, काव्यवाचन, वाद्यवादन, नृत्य असे विविध कार्यक्रम सादर केले. यात रमा कानविंदे, शाल्व कारेकर, श्रावणी शिंदे, सोहन शिंदे, अनुजा शिंदे, योजना कुबल, नंदिनी बोरकर, सान्वी लिंगायत, नभा बडे, जय रांगणकर, श्रावणी पाटील, स्वराली साळवी, अर्णव शहाणे, आयुष हरचिरकर, ओम पवार, हृषिकेश मोंडकर, राजवर्धन वारंगे, देवेंद्रसिंह चौहान, कौशल कोतडेकर, सान्वी शिंदे यांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज, राणाप्रताप आणि राणी लक्ष्मीबाई या नावाच्या चौथीच्या वर्गांतील सर्व विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सुरेख सादर केले. Snehamelava at Agashe Vidyamandira


या कार्यक्रमाला या वेळी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, शाळा प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, चौथीच्या वर्गशिक्षिका भारती खेडेकर, ईशा रायंगणकर आणि सोमनाथ दुकले व अन्य शिक्षिका, शिक्षक उपस्थित होते. Snehamelava at Agashe Vidyamandira


याप्रसंगी डॉ. चंद्रशेखर केळकर म्हणाले की, बालवाडी ते चौथीपर्यंत आनंदाचे अनेक क्षण विद्यार्थ्यांनी शाळेत अनुभवले आहेत. हे क्षण आयुष्यभर जपून ठेवावेत. कोरोना काळात शाळेने कधी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण चालू ठेवले होते. आता पाचवीत जाताना विद्यार्थ्यांनी अभ्यास वाढणार आहेत. चिकाटी, मेहनतीने शिक्षण पूर्ण करा व शाळा, संस्था, रत्नागिरीचे नाव मोठे करा. Snehamelava at Agashe Vidyamandira
अध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी सांगितले की, बालवाडीपासून विद्यार्थी येथे आहेत. त्यांना शिक्षकांनी आनंददायी शिक्षण दिले आहे. इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी संजीवन गुरुकुल हा विद्यार्थ्यांना चांगला पर्याय आहे. मी कार्याध्यक्ष असताना २००४ पासून गुरुकुल सुरू झाले. १२ तास शाळा असते. पण शाळेतून दप्तरे घरी न्यायला नकोत. विद्यार्थी अष्टपैलू होण्याकरिता गुरुकुल शिक्षण महत्त्वाचे आहे. Snehamelava at Agashe Vidyamandira
विनायक हातखंबकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शाळा, संस्थेची भूमिका मांडली. पालकांच्या सहकार्यामुळेच शाळेला चांगले शिक्षण देण्याकरिता पाठबळ मिळते. आज जुने फोटो पाहताना विद्यार्थी अगदी उत्साहित, प्रफुल्लित झाले. असेच आयुष्यभर आनंदी राहायला शिका, असे सांगितले. या प्रसंगी पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे आणि संजीवन गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख मनोज जाधव यांनी इयत्ता पाचवीतील प्रवेशाबद्दल आणि शाळेच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली. Snehamelava at Agashe Vidyamandira
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व उपक्रमांच्या छायाचित्रांचा व्हिडिओ सर्वांना आवडला. पालकांनीही मनोगतामध्ये मुलांना या शाळेत पाठवल्याने मुले खूप हुशार बनल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी पालकांनी शाळेकरिता मदतनिधी दिला. सोमनाथ दुकले यांनी सूत्रसंचालन केले. ईशा रायंगणकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिक्षक, पालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. Snehamelava at Agashe Vidyamandira

