गुहागरचे नाव पोचविले आंतरराष्ट्रीय स्तरावर
गुहागर, ता. 11 : भविष्यात होणाऱ्या सायबर युध्दांपासून वाचण्यासाठी सायबर सुरक्षाविषयक धोरण कसे असावे. सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणते डावपेच आखावेत. या विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऐश्र्वर्या फुणगुसकरच्या टीम आर्मिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. ही स्पर्धा सायबर सुरक्षाविषयक काम करणाऱ्या 6 आंतरराष्ट्रीय संस्थांनी भरविली होती. सुमारे 70 देशांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. Aishwarya get CyberPeace Foundation award


सायबर पीस फाऊंडेशन Cyber Peace Foundation (CPF), इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत Ministry of Electronics and Inforamtion Technology, Government of India, Cybersecurity Centre of Excellence (CCoE), सायबर सिक्युरिटी चॅलेंज युके Cyber Security Challenge UK Board, इंडियाना युनिर्व्हसिटी ब्लुमिंगटन Indiana University, Bloomington, जागतिक वेब फाऊंडेशन World wide Web Foundation, हॅकिंग लॅब सायबर रेंज Hacking lab cyber range या संस्थांनी सायबर सुरक्षा या विषयावर स्पर्धेचे आयोजन केले होते.


भविष्यात जगातील युध्दे ही सायबर हल्ल्यांवर Cyber Peace Foundation आधारीत असतील. शत्रुराष्ट्राच्या विविध संकेत प्रणालीवर हल्ले करुन संपूर्ण यंत्रणा उध्वस्थ केली जाईल. याची चुणूक मुंबईतील पॉवर ग्रीडवर झालेल्या सायबर हल्ल्यातून पहायला मिळाली. कोणताही अपघात न होता मुंबईतील वीज काही मिनीटे गायब झाली होती. हे सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या प्रकारचे धोरण हवे. हे हल्ले होऊ नये यासाठी कोणते डावपेच आखले पाहिजेत. सायबर हल्ला झाल्यास त्यातून डाटा कसा सुरक्षित ठेवावा. हल्ला रोखण्यासाठी कसे काम करावे. हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा भरविण्यात आली होती. Aishwarya get CyberPeace Foundation award
टीम आर्मी ची लिडर ऐश्वर्या फुणगुसकर
या स्पर्धेमध्ये विविध देशातील स्पर्धकांच्या टीम बनविण्यात आल्या होत्या. ऐश्वर्या फुणगुसकर टीम आर्मीची टीम लिडर होती. या टीममध्ये पश्चिम बंगाल मधुन अंकित प्रधान, आसाममधील अभिषेक बोरा आसाम, सेंट्रल आफ्रिका या देशातील बोगली सिरिली, मुंबईचा ईशान पंडीता सहभागी झाले होते. Aishwarya get Cyber Peace Foundation award
स्पर्धेचे स्वरुप
याबाबत बोलताना ऐश्वर्या फुणगुसकर म्हणाली की, सायबर धोरण आणि डावपेच (cyber poliicy and strategy track) या स्पर्धा प्रकारात आम्ही सहभागी होतो. टीम आर्मीला सायबर हल्ले रोखण्याचे धोरण आणि डावपेच यासंदर्भात प्रकल्प अहवाल सादर करायचे होते. मुंबईच्या पॉवर ग्रीड, युके चायना ट्रेड वॉर, युक्रेन पॉवर ग्रीड हल्ला आदी सध्या जगात सुरु असलेल्या सायबर हल्लांचा अभ्यास या टीमने केला. आमच्या टीममध्ये संवाद साधणे हे मोठे आव्हान होते. प्रत्येक प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी केवळ 36 ते 48 तासांचा कालावधी मिळायचा. संपूर्ण काम ऑनलाइन करावे लागायचे. त्यासाठी आम्ही गुगल ट्रान्सलेटरचा वापर करायचो. स्पर्धेतील महत्त्वाची अट होती की संपूर्ण अहवालामध्ये गुगल किंवा अन्य सर्च इंजिनवर सापडणारा संदर्भ असता कामा नये. त्यामुळे पूर्णपणे नवीन उपाययोजना आणि धोरणाची निर्मिती करणे हे आव्हान होते. Aishwarya get CyberPeace Foundation award


टीम आर्मीचे यश
या स्पर्धेत ऐश्र्वर्याच्या स्पर्धकांमध्ये अनेक वर्ष काम करणारे संशोधक, प्रोफेसर यांचा सहभाग होता. तर टीम आर्मीमध्ये सायबर सुरक्षाविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. गुहागरातील डॉ. संदीप फुणगुसकर आणि डॉ. सौ. सुवर्णा फुणगुसकर यांची मुलगी ऐश्र्वर्या सध्या ॲमिटी विद्यापीठ नोएडाच्या मुंबईतील कॉलेजमध्ये सायबर सिक्युरिटी आणि क्लाऊड कॉम्युटींग या विषयात बी. टेक.चे शिक्षण घेत आहे. तिच्यासोबत असलेले सहकारी देखील अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. या पार्श्र्वभुमीवर सायबर धोरण आणि डावपेच (cyber poliicy and strategy track) या स्पर्धा प्रकारात ऐश्वर्याच्या टीम आर्मिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले. Aishwarya get CyberPeace Foundation award