जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या मुलांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव जीवन देसाई (इयत्ता ७ वी) व सुकन्या मनस्वी जीवन देसाई (इयत्ता ४ थी) यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल गुहागर तालुक्यातील सुयश कॉम्प्युटर सेंटर, आबलोलीचे संचालक संदेश गजानन साळवी यांनी रत्नागिरी येथे जाऊन अभिनव देसाई यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. Abhinav and Manasvi felicitated by Yash Computer

तसेच, सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका सौ. सावी संदेश साळवी यांनी मनस्वी जीवन देसाई हिचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करून तिचे अभिनंदन केले. यावेळी सौ. मयुरी जीवन देसाई यांनी संदेश गजानन साळवी व सौ. सावी संदेश साळवी यांचे स्वागत केले. Abhinav and Manasvi felicitated by Yash Computer
