शेतकरी अडचणीत, सरकारी मदतीची मागणी
गुहागर, ता. 07 : कोकणातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या काजूच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. Decline in Cashew Production
सद्यस्थितीत बाजारपेठेत काजूला १६० ते १७० रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत असला, तरी हातात मालच नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनातील घटीची मुख्य कारणे हवामानातील बदल लांबलेला पाऊस आणि मोहराच्या काळात आलेले धुके यामुळे काजूची मोठी फुलगळ झाली. रोगराईचा प्रादुर्भाव कीड आणि रोगांच्या वाढत्या प्रभावामुळे फळधारणेवर परिणाम झाला आहे. Decline in Cashew Production

व्यापाऱ्यांची स्थिती एकीकडे बाजारात काजूचा तुटवडा असल्याने व्यापाऱ्यांना पुरेसा माल उपलब्ध होत नाहीये. मालाची कमतरता असल्याने दर तेजीत आहेत, मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा साठा नसल्याने या वाढीव दराचा फायदा त्यांना घेता येत नाहीये. दर वाढले असले तरी उत्पादन ५० टक्क्यांहून अधिक घटले आहे. खर्चही निघणे कठीण झाले असल्याने सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. आता यावर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्व बागायतदारांचे लक्ष लागले आहे. Decline in Cashew Production
