रत्नागिरी, ता. 07 : वानर, माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याकरिता उपोषणाला बसलेले शेतकरी अविनाश काळे यांनी सुरू केलेले उपोषण पालकमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर २० ऑक्टोबरपूर्वी त्यांच्यासमवेत रत्नागिरीतील शेतकऱ्यांची बैठक घेऊया. मी शेतकऱ्यांच्या वतीने वानर, माकडांचा त्रास होत असल्याची समस्या मांडेन आणि त्यावर तोडगा काढूया, हा धोरणात्मक निर्णय असल्याने वनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊया, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळी काळे आणि सर्व शेतकऱ्यांना आश्वस्त केले. Avinash Kale hunger strike suspended
वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. या प्रश्नासाठी गेल्या वर्षी काळ यांनी एक दिवशीय उपोषण केले होते. तसेच रत्नागिरीत बैठक घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांनाही निवेदने दिली होती. यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. परंतु आता वनमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर पुढील भूमिका ठरवू. अन्यथा स्थगित उपोषण पुन्हा सुरू करू, असे काळे यांनी या वेळी जाहीर केले. दिवसभरात सुमारे पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. Avinash Kale hunger strike suspended
पालकमंत्र्यांशी बोलताना श्री. काळे यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये वन्य प्राणी नीलगायींचा त्रास होत असल्याने सरकारने अध्यादेश काढला. बिहारमध्येही माकडांमुळे त्रास होत असल्याने त्यांना सरकार मारत आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारे कायदा करण्यात यावा. यापूर्वी निवेदने देऊनही त्याला उत्तरसुद्धा देण्यात आले नाही. Avinash Kale hunger strike suspended
पत्रकारांशी बोलताना अविनाश काळे यांनी सांगितले की, मी आमरण उपोषण सुरू केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी विनंती केली, हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न बरोबर आहे, मी पाठिशी आहे, हा धोरणात्मक आहे, वनमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याने निर्णय होऊ शकत नाही. २० तारखेच्या आत आपण त्यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढू. ते आमची बाजू मांडणार आहेत. उपोषण स्थगित करा, त्यांच्यावर मंत्री महोदयांनी आश्वस्त केल्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे. वनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पालकमंत्री सामंत आमच्यासमवेत असतील व ते शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगतील. यातून तोडगा निघावा. तोडगा न निघाल्यास पुन्हा उपोषण करू. उपोषणादरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उदय बने, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन, सांगलीतील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे आले होते. Avinash Kale hunger strike suspended