• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संततधार पावसामुळे यावर्षी भातपीक धोक्यात

by Ganesh Dhanawade
September 28, 2023
in Maharashtra
126 1
1
Rice crop in danger due to incessant rains
247
SHARES
706
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला

गुहागर, ता. 28 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पाणी भात शेतात कायम साचून राहिल्यामुळे सद्या पोटरी वळलेले या पिकावर मोठ्या पावसाने विपरीत परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. Rice crop in danger due to incessant rains

शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने व मेहनतीने शेती केली असून रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे घराजवळ भात खाचरात मोठ्या प्रमाणावर भाताचे पिक घेतले आहे. त्यासाठी भाजावळी पूर्व मशागत व त्यानंतर नांगरणी साठी पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भाताची शेती केली आहे. खते व मजुरी यावर शेतकऱ्यांचे भरपूर श्रम व पैसा खर्च झाला आहे. गुहागर तालुक्यात भाताचे ४१०० हेक्टर क्षेत्र असून या पिकाची उत्पादकता हेक्टरी ३२०० क्विंटल प्रती हेक्टर आहे. त्या खालोखाल नागलीचे तालुक्यात ३९५० हेक्टर क्षेत्र आहे. नागली व वरी या पिकांचे तालुक्यात प्रत्येक गावात मोठे क्षेत्र होते. परंतू, जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी रानातल्या शेतीला रामराम केला. व घराजवळील खाचरात व सखल भागात भात पिकावर जोर धरला. Rice crop in danger due to incessant rains

यामुळे सुरू असलेल्या पावसात भात नागली व नारळ सुपारी तसेच आंबा व काजू पिकावर बुरशी जन्य रोगावरील फवारणी करू नये. कारण पावसात ही फवारणी वाया जाऊ शकते. भात खाचरात साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. खतांची मात्रा द्यावयाची असल्यास काही दिवस पाऊस थांबण्याची वाट पहावी असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. Rice crop in danger due to incessant rains

यावर्षी जुलैमध्ये चांगला पाऊस होता. तर ऑगस्ट महिन्यात उन्हाचा कडाका वाढला होता. सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली. अखेरीस तर धो धो पाऊस सुरू झाला आहे. भात लागवडीनंतर तिसऱ्या महिन्यात भाताच्या काड्या पोटरी वळतात. व दाणे तयार होतात. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असायला हवे. सप्टेंबरमध्ये भात खाचरात भाताच्या बुंध्यांशी कमी प्रमाणात पाणी असावे लागते. मात्र, सद्या कोसळणाऱ्या पावसामुळे भात खाचरात भात कांडया वरपर्यंत भिजताना दिसत आहेत. या अशा परिस्थिति त बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते. किडींचा प्रादुर्भाव वाढतो व तो पिकाच्या दृष्टिने हानीकारक ठरतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस अशीच संततधार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहनत केलेल्या शेतकऱ्यांचे या पावसाने तोंडचे पाणीच पळवळे आहे. Rice crop in danger due to incessant rains

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRice crop in danger due to incessant rainsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share99SendTweet62
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.