गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या मोडकाआगर धरण नजीक विहीरीचे भूमिपूजन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, युवा कार्यकर्ता प्रशांत विचारे, गणेश किर्वे, अनंत रांजाणे, जितेन्द्र विचारे, संदीप विचारे, सुहास विचारे, जयंत विचारे, दीपक किर्वे, वैभव पवार, पोलीस पाटील सुजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश नारकर, नरेश रांजाणे, संदीप पवार, श्रावणी शिंदे, अरुण रावणग, सेजल शिंदे, धनश्री चांदोरकर, संतोष देसाई, दीपक विचारे, विलास किर्वे, राजहंस विकास मंडळ वरवेली रांजाणेवाडी अध्यक्ष अविनाश रांजाणे, राजहंस नमन मंडळ गट क्रमांक १ चे अध्यक्ष अनंत जावळे, ग्रामसेवक महेंद्र भूवड आदी उपस्थित होते. Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana

आ. जाधव यावेळी बोलताना म्हणाले की, जलजीवन मिशनचे ठेकेदार हे विशिष्टय पक्षाचे असल्याने जाणीव पुर्वक माझ्या मतदारसंघातील नळपाणी योजनेच्या कामांना विलंब करत आहेत. परंतु, ज्यांची २० लाख रु. खर्च करण्याची ताकद नाही अशाना पाच, दहा, वीस कोटी रुपयांचे कामे देण्यात आली आहेत. हा सगळा बट्याबोळ आहे. जलजीवन मिशन योजना ही राष्ट्रीय पेयजल योजनेसारखीच आहे. फक्त तिचे नाव बदलण्यात आले आहे. या योजनेच्या कामावर सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थानी योग्य प्रकारे लक्ष ठेऊन काम करून घ्या, असे आवाहन करताना कधी माझे ठेकेदाराशी देणेघेण नसते. मी प्रत्येक योजनेबाबत ठेकेदार व अधिकारी यांना सडेतोडपणे बोलत असतो. आपली बांधिलकी अधिकाऱ्याशी आहे. अधिकाऱ्यानी चांगले काम करून घ्यावे हीच अपेक्षा, असे
त्यांनी सांगितले. Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana
