मार्गताम्हाने येथील ओसाड माळरानावर केली आंबा, काजू लागवड
गुहागर, ता. 20 : जिल्ह्यात फळलागवडीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करताना दिसून येत आहेत. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द येथील एका शेतकऱ्याने इस्त्राईल तंत्रज्ञान वापरत आपल्या ३ एकर क्षेत्रात फळबाग लागवड केली आहे. यामध्ये १ हजार केशर आंबा व ५०० वेंगुर्ला-७ काजू रोपांची लागवड करुन फळलागवडीचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. Orchards on barren farmland

कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून इस्त्राईल तंत्रज्ञानाने फळबाग लागवड केली. तर त्याचा हमखास फायदा होतो हे ओळखून मार्गताम्हाने खुर्द येथील देविदास गुणाजी चव्हाण या शेतकऱ्याने फळलागव़डीची अनोखी संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी आपली दोन मुलगे शैलेश व सागर चव्हाण यांच्या सहकार्यातून हा प्रयोग यशस्वी केला आहे. पारंपरिक लागवडीमध्ये १ एकरमध्ये आपण फक्त ४० कलमे लावतो व त्याची फळधारणा होण्यासाठी खूप अवधी लागत होता. परंतु इस्त्राईल पध्दतीने लागवड केल्यास १ एकरामध्ये आपण १२०० केसर कलम लावू शकतो. व तिसऱ्या वर्षी उत्पन्न सुरु होते. ही लागवड करताना आंबा हा ३ फूट बाय १२ फूट वर करण्यात येतो. तसेच काजू ६ फूट बाय १४ फूट वर लागवड करण्यात येते. तसेच या बागेमध्ये विविध प्रकारचे आंतरपीकही शेतकरी घेऊ शकतो. Orchards on barren farmland

मार्गताम्हाने खुर्द येथील शेतकरी देविदास चव्हाण यांनी पद्मवन अँग्रो फार्मची निर्मिती करुन कोकणात हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. आपल्या ३ एकर क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केशर आंबा १ हजार व ५०० वेंगुर्ला काजू यांची लागवड केलीच आहे. शिवाय जगातील सर्वात महाग असा मियाझाकी आंबा, टाँमी एटकिंग आंबा यांचीसुध्दा लागवड केली आहे. या फार्मच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. Orchards on barren farmland

फळलागवडीतून मार्गताम्हाने गाव वणवामुक्त होईल
मार्गताम्हाने हा सपाट जमिनीचा भाग आहे. अशा माळरानावरील सुपिक जमिनीत अलिकडे शेती करणे बहुसंख्य लोकांनी टाळले आहे. या जमिनी ओसाड असून दरवर्षी पावसाळ्यानंतर या भागात वणवे जातात. वनसंपदा राख होते. त्यामुळे अशा ओसाड जागेवर सर्वच जमीनदार शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केल्यास गाव वणवामुक्त नक्कीच होईल व इतर गावांसमोर एक आदर्श राहिल असा आत्मविश्वास शेतकरी देविदास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. Orchards on barren farmland

