भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू ; ७५९ लाख मे. टन अन्न-धान्याचे वितरण
गुहागर, ता. 18 : कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मार्च २२ पर्यंत राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना ७५९ लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित करण्यात आल्याचे तर राज्य सरकारांमार्फत ८० कोटी लाभार्थ्यांना ६९० लाख मेट्रिक टन अन्न-धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांनी दिली. Poor Welfare Scheme


भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी ते बोलत होते. या योजनेवर मोदी सरकारने आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचेही डॉ.नातू यांनी सांगितले. ते म्हणाले की, २६ मार्च २०२० रोजी कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या काळात गोर-गरिब, श्रमिक, कामगार यांची उपासमार होऊ नये यासाठी मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली. या योजनेतून ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो गहू, तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाते. या योजनेची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. Poor Welfare Scheme


एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या काळात गरीब कल्याण अन्न योजनेतून राज्य सरकारांद्वारे ६९० लाख मेट्रिक टन अन्न-धान्य वाटप करण्यात आले आहे. या योजनेच्या सहाव्या टप्प्यात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत राज्य सरकारांना २४४ लाख टन अन्न-धान्य दिले जाणार आहे. त्यासाठी ८० हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च मोदी सरकारकडून केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. Poor Welfare Scheme
मोदी सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेमुळे गोर-गरीबांचा मोठा फायदा झाल्याचे मत नोंदवत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मोदी सरकारचे कौतुक केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. Poor Welfare Scheme