• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाआवास अभियानात रत्नागिरी जिल्हा व्दितीय

by Guhagar News
April 30, 2022
in Ratnagiri
16 0
0
Ratnagiri district second in MahaAwas Abhiyan
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

5 हजार 12 घरे झाली बांधून; 851 घरांची कामे प्रगतिपथावर

रत्नागिरी  दि. 30 : महाआवास अभियान (MahaAwas Abhiyan)2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्य स्तरावर सर्वाकृष्ट काम करणाऱ्या जिल्हांमध्ये रत्नागिरीला व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. राज्यस्तरावरून दिलेल्या उदिद्ष्टांमधील 5 हजार 12 घरे बांधून पूर्ण केली. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दररोज तालुका स्तरावरून आढावा घेतला जात होता. समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्यात येत होती. Ratnagiri district second in MahaAwas Abhiyan

शासन पुरस्कृत योजनेंतर्गत रमाई आणि शबरी आवास योजनेतील घरांचे उदिदष्ट पूर्ण करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2019 ते 5 जून 2021 या कालावधीसाठी महाआवास अभियानात (MahaAwas Abhiyan) राबविण्यात आले होते. शासनाने प्रत्येक जिल्ह्याला उदिदष्ट निश्चित करून दिले होते. रत्नागिरी जिल्ह्याला 5 हजार 863 प्रस्ताव पूर्ण करावयाचे होते. त्यातील 5 हजार 842 जणांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला. त्यापैकी 5 हजार 12 घरे बांधून झाली आहेत.  851 घरांची कामे प्रगतिपथावर आहेत. Ratnagiri district second in MahaAwas Abhiyan

Ratnagiri district second in MahaAwas Abhiyan

समस्या सोडविण्यावर भर

ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्याला मिळालेले लक्ष्य पुर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेण्यास सुरूवात केली होती. कामाची स्थिती, कोणत्या अडचणी येतात, आवश्यक साहित्य किंवा कुशल कामगारांची स्थिती यावर भर दिला. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणा पोचली आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. मंजूर झालेल्या घराचा परिपूर्ण प्रस्तावात जातीचा दाखला  मिळवणे कठिण जात होते. ही बाबत लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. इंदूराणी जाखड, प्रकल्प संचालक एन.बी. घाणेकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे उपविभागीय स्तरावर लवकरात लवकर दाखले मिळण्यास सुरूवात झाली. Ratnagiri district second in MahaAwas Abhiyan

दहा सुत्रे अशी

भूमिहीनांना जागा देणे, गृह संकुल उभारणे, उदिद्ष्टात 100 टक्के मंजुरी मिळवणे, पहिला हप्ता त्वरित देणे, भौतिक व आर्थिकदृष्ट्या घरकुलं पूर्ण करणे, गवंडी प्रशिक्षण घेणे, जिल्हा व तालुकास्तरावर डेमो हाऊसेस बांधणे, शासकीय योजनांचा संमन्वय साधणे, नाविन्य उपक्रमांवर भर देणे या दहा सुत्रांचा वापर करणे. यामुळे हे साध्य झाले.

गटविकास अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका

दरम्यान, वाळू, चिरे, व मातीवर आकारण्यात येणारी राँयल्टी लाभार्थ्यांसाठी अडचणीची ठरली होती. ती माफ करण्यासाठी प्रशासन सरसावले. गटविकास अधिकाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली. घर बांधण्यासाठीच्या साहित्याचा तुटवडा भासू नये, यासाठीही यंत्रणेकडून लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे बांधकाम सुरू केल्यावर तीन ते चार महिन्यांमध्ये घरं उभी राहीली.

5 हजार 863 रत्नागिरी जिल्ह्याला प्रस्ताव पूर्ण करावयाचे होते.
5 हजार 842 पहिला हप्ता बँक खात्यात सुपूर्त केलेल्यांची संख्या
5 हजार 12 घरे बांधून झाली
851 घरांची कामे प्रगतिपथावर

महाआवास अभियानातर्गत (MahaAwas Abhiyan) सर्व जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात अहमदनगर जिल्ह्याने प्रथम तर रत्नागिरीला जिल्ह्याने व्दितीय क्रमांक पटकवल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केले. पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. Ratnagiri district second in MahaAwas Abhiyan

Tags: GuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRatnagiri district second in MahaAwas Abhiyanटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.