परमपुज्य अण्णा महाराज, श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्रात गुरूदिक्षा, स्पर्शदिक्षा सोहळा
मुंबई : विक्रोळीतील श्री स्वामी दत्त फाऊंडेशन (Sri Swami Dutt Foundation)अंतर्गत श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्र, मुंबई मधील गुरूसेवकांचा गुरूदिक्षा, स्पर्शदिक्षा सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी दत्त फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष प.पु.अण्णा महाराज यांनी अध्यात्मिक क्षेत्रात गुरूमार्गावर चालून कार्य करा. असे आवाहन केले.


सोहळ्यादरम्यान श्री स्वामी दत्त फाऊंडेशनचे संस्थापक (Sri Swami Dutt Foundation) अध्यक्ष श्री. आण्णा महाराज यांनी श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नत्ती केंद्र, मुंबई विभाग अध्यक्ष पदी श्री. वैभव हाटकर तर उपाध्यक्षपदी श्री. रोहन आर्यमाने या दोन गुरूसेवकांची निवड जाहीर केली आहे. तसेच गुरूदिक्षा, स्पर्शदिक्षा सोहळ्याचे औचित्य साधून श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्र, मुंबई मधील गुरूसेवकांना श्री स्वामी दत्त फाऊंडेशन चे कृष्णकांत घाडीगांवकर, राजश्री पाटील, रोहन आर्यमाने, वैभव हाटकर व सौ. वनिता देवळेकर या मुंबई केंद्रातील पाच गुरूसेवकाचा जय स्वामी दत्त सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तर आजीवन सभासदांना प्रमाणपत्र देऊन मुंबईमधील गुरूसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सोहळ्यादरम्यान सामुदायिक साप्ताहिक श्री स्वामी दत्त बैठक संपन्न झाली. त्यानंतर गुरूसेवकांसोबत चर्चासत्र घेण्यात आले. सर्व गुरूसेवकांशी कौटूंबिक, अध्यात्मिक हितगुज करण्यात आले.
श्री स्वामी दत्त अध्यात्मिक उन्नती केंद्र, मुंबई यांनी या कार्यक्रमाचा सोहळा अतिशय नियोजनपूर्वक करण्यासाठी मुंबईमधील सर्वच गुरूसेवकांनी सहकार्य केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहन आर्यमाने ह्यांनी केले. फाऊंडेशनचे (Sri Swami Dutt Foundation) संस्थापक अध्यक्ष श्री. आण्णा महाराज यांनी मुंबई विभागाची पुढील कार्यकारणी नेमण्याची सुचना अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना दिली.
कार्यक्रमासाठी श्री. आण्णा महाराज , यशश्री जोशी (ताई), प्रिया दीदी, श्री. दयानंद गुरूजी आणि मुंबईमधील गुरूसेवक यांची विशेष उपस्थिती होती.


गौरव गुरूशिष्य परंपरेचा (Sri Swami Dutt Foundation)
२०२१ श्री स्वामी दत्त फाऊंडेशन (Sri Swami Dutt Foundation) अंतर्गत सर्व गुरूसेवकांचे फाऊंडेशनसाठी असलेले कार्य आणि गुरूसेवेबद्दल असलेली निष्ठा ह्याचा आढावा घेवून एकूण १५२ गुरूसेवकांना आजीव सभासदत्व जाहीर करण्यात आलेले आहे.
तसेच गुरूआदेशाचे पालन करत अत्यंत निष्ठापूर्वक कार्य करणारे आणि श्री स्वामी दत्त फाऊंडेशनला (Sri Swami Dutt Foundation) सहकार्य करणार्या गुरूसेवकांमध्ये एकूण १७ गुरूसेवकांची श्री स्वामी दत्त फाऊंडेशन अंतर्गत दिले जाणारे जय स्वामी दत्त सन्मानचिन्ह यासाठी निवड झालेली आहे.


यामध्ये श्री. कृष्णकांत घाडीगावकर (मुंबई), श्री. वैभव चांदोरकर व सौ. योगिता चांदोरकर- (लोणावळा), श्री. प्रतिक टाकवडेकर- (कोल्हापूर), शिला लोंढे- (पूणे), राजश्री पाटील- (मुंबई), श्री. दिनानाथ बन व सौ. माधवी बन- (पूणे), श्री. मनोज मुळे- (पूणे), सौ. रूपाली देवरे- (नाशिक),श्री. रोहन आर्यमाने- (मुंबई), श्री. वैभव हतकर- (मुंबई), सौ. प्राजक्ता प्रधान- (कोल्हापूर), श्री. गडूलाल हेडा व सौ. मंजिरी हेडा- (नाशिक), श्री. गणेश दारवंटे- (औरंगाबाद), श्री. ओमकारराजे भोसले- (सातारा),सौ. वनिता देवळेकर- (मुंबई) , श्री. संभाजी पाटील- (सांगली), श्री. अनिल गोविंद व सौ. अलका गोविंद- (मालेगाव- नाशिक) यांचा समावेश आहे. यातील पाच जणांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.
उर्वरीत पुरस्कार व आजीवन सभासदत्व लवकर देण्यात येईल. असे श्री स्वामी दत्त फाऊंडेशन (Sri Swami Dutt Foundation) संस्थापक अध्यक्ष अण्णा महाराज यांनी सांगितले. तसेच सर्व गुरूसेवकांनी श्री स्वामी दत्त फाऊंडेशन चे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवून संस्थेच्या अध्यात्मिक कार्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.

