• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटी लोकांवर उपचार

by Guhagar News
April 9, 2022
in Health
16 0
0
Treatment through Ayushman Bharat Yojana
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू

गुहागर, ता. 09 : मोदी सरकारने गोरगरीब , वंचितांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) योजनेतून आजवर देशभरात ३. २८ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ कोटींपेक्षा अधिक लोकांना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली. Treatment through Ayushman Bharat Yojana

स्वस्त दरात औषधे पुरविण्याच्या उद्देशाने देशभरात ८ हजार ६९४ पंतप्रधान जनऔषधी केंद्रे सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापनादिनानिमित्त मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की , गोरगरीब, वंचित वर्गातील जनतेला अनेक आजारांवरील महागडे उपचार परवडत नाहीत हे ओळखून मोदी सरकारने (Modi government) सप्टेंबर २०१८ मध्ये आयुष्मान भारत योजनेचा प्रारंभ केला. या योजनेत खासगी आणि सरकारी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेत सरकारी आणि खासगी मिळून २७ हजार ३०० रुग्णालये सहभागी झाली आहेत. Treatment through Ayushman Bharat Yojana

आयुष्मान भारत डिजिटल मिशनसाठी मोदी सरकारने सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत देशभरातील १०. ७४ कोटींपेक्षा अधिक गोरगरीब , वंचितकुटुंबांना म्हणजे ५० कोटी लोकांना मोफत उपचाराची सुविधा देणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी  mera.pmjay.gov.in नावाचे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. तसेच 14555 आणि 1800-111-565 टोल फ्री क्रमांकांवरही या योजनेची माहिती मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेतलेल्यांमध्ये सुमारे ४७ टक्के महिला आहेत, अशी माहिती ही त्यांनी दिली.  Treatment through Ayushman Bharat Yojana

ते म्हणाले की, देशातील आरोग्य सेवा आणिसुविधा परिपूर्ण बनविण्यासाठी मोदी सरकारने ‘आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ६५ हजार कोटी रुपये खर्चून देशभरातील आरोग्य केंद्रात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हापातळीवरील सरकारी रुग्णालयात आयसीयु, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन या सुविधांसह ३७ हजारबेड उपलब्ध केले जाणार आहेत. या बरोबरच ब्लॉक पातळीवर ४ हजार पेक्षा अधिकसार्वजनिक आरोग्य केंद्रे तसेच प्रयोगशाळा सुरु केल्या जाणार आहेत. मोदी सरकारने सिरींज, डिजिटल थर्मामीटर, स्टेंट , डायलिसिस मशीन या सारख्या उपकरणांना औषधांच्या श्रेणीत आणल्यामुळे या उपकरणांच्या किंमती नियंत्रणात आल्या आहेत. मोदी सरकारने कॅन्सर, टीबी, मधुमेह यासारख्या दुर्धर आजारावरील ८०० औषधे कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या ९ मार्च २०२२ पर्यंत ८ हजार ६९४ पर्यंत पोहचली आहे, असेही त्यांनी सांगितले. Treatment through Ayushman Bharat Yojana

Tags: Ayushman Bharat YojanaDr. Vinay NatuGuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsModi governmentNews in GuhagarTreatment through Ayushman Bharat Yojanaटॉप न्युजताज्या बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.