नाशिकमधील संस्थेने केले होते फेसबुक लाईव्ह बालकवी स्पर्धेचे आयोजन
गुहागर, ता. 19 : ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक आयोजित राज्यस्तरीय फेसबुक लाईव्ह स्पर्धेत किलबिल गटात गुहागरच्या उर्वी बावधनकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर किशोर गटात रत्नागिरी तालुक्यातील अथर्व बिलवलकरने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. ज्ञानवर्धिनीच्या 21 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन बालकवी स्पर्धेत राज्याती सर्व तालुक्यातून एकूण 1568 स्पर्धक सहभागी झाले होते.
ज्ञानवर्धिनी, नाशिक आयोजित जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा सन 2000 साली 22 विद्यार्थ्यांवर सुरू झाली.आता या छोट्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. राज्यस्तरीय ऑनलाइन बालकवी स्पर्धेत गेल्या २० वर्षापासून 600 ते 650 विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात.
ज्ञानवर्धिनी, नाशिकने घेतलेल्या या स्पर्धेत किलबिल गट (बालवाडी ते दुसरी), बाल गट (तिसरी ते पाचवी), किशोर गट (सहावी ते आठवी), कुमार गट (नववी ते बारावी) असे चार गट होते. या स्पर्धेचा निकाल आज फेसबुक लाईव्ह पद्धतीने जाहीर करण्यात आला.
किलबिल गटातून प्रथम क्रमांक उर्वी बावधनकर गुहागर, द्वितीय क्रमांक सई जोगळेकर जुन्नर, तृतीय क्रमांक कौशल सोनवणे, कोपरगाव आणि उत्तेजनार्थ श्रीरंग कुलकर्णी औरंगाबाद व कृष्णा गराडे कोपरगाव.
बाल गटात प्रथम क्रमांक अर्णव शिवलकर मुंबई, द्वितीय क्रमांक अन्वी जायभावे अकोला, तृतीय क्रमांक शरण्या पाटील कोल्हापूर, उत्तेजनार्थ अन्वित जाधव निफाड व प्रांजल सोनवणे शिरपूर.
किशोर गटात प्रथम क्रमांक ऋतुजा गावडे सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक अथर्व बिलवरकर रत्नागिरी, तृतीय क्रमांक प्रज्ञा भामरे अंबरनाथ, उत्तेजनार्थ मल्हार क्षेमकल्याणी व भार्गव सांजराय दोघेही नाशिक.
कुमार गटात प्रथम क्रमांक सृष्टी सोनवणे निफाड, द्वितीय क्रमांक शुभांगी शिंदे सोलापूर, तृतीय क्रमांक स्वानंद पारखी नाशिक, उत्तेजनार्थ प्राची देशमुख वाशिम, व निखिल राऊत अमरावती या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
या स्पर्धेचा निकाल फेसबुक लाईव्ह वर घोषित करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसाचे प्रायोजकत्व प्रथम क्रमांक डॉ. सौ. मुग्धा सापटणेकर, द्वितीय क्रमांक श्री. बाबा कुलकर्णी, तृतीय क्रमांक ॲड. राजश्री क्षत्रिय, व उत्तेजनार्थ चार व पाचचे बक्षीस ॲड. इंद्रायणी पटनी हे आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा .श्री अरुण म्हात्रे, मा. माधुरी माटे, मा. श्री. प्रदीप जी निफाडकर यांनी व्हिडिओद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. ल. जी. उगावकर, सचिव श्री गोपाळ पाटील सर, सह सचिव ॲड. अंजली पाटील, संचालक वसंतराव कुलकर्णी , श्री अनिल भंडारी श्रीमती छायाताई निखाडे, डॉ. सौ .मुग्धा सापटणेकर, प्राचार्य शरद गीते, आनंदवन बाल मंदिराच्या मुख्यताई पूनम सोनवणे, प्राथमिक विभागाच्या सौ. माधुरी मरवट, इंग्रजी माध्यमाच्या विद्या अहिरे हे उपस्थित होते.
राज्यस्तरीय ऑनलाइन बालकवी स्पर्धा जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा सन 2000 साली 22 विद्यार्थ्यांवर सुरू झाली.आता या छोट्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या २० वर्षापासून 600 ते 650 विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात . या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. गोपाळ पाटील सर यांनी केले.

