• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे

by Ganesh Dhanawade
July 2, 2021
in Old News
16 0
2
शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार तुमच्या हक्काचं सरकार आहे. तुमच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे, असे सांगतानाच शेतकरी राज्याचं वैभव आहे. आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठी आहे. अन्नदाता आणि जीवदाता एकच आहेत. आर्थिक संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत करणारच, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना प्रयोगशील होण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने जपानमधील आंबा पिकवल्याची बातमी दाखवली. तुम्ही प्रयोगशील व्हा. तुमच्या प्रयोगासाठी आम्ही मदत करू.शेती क्षेत्रासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, असे सांगतानाच शेतकरी कायमचा चिंतामुक्त झाला पाहिजे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये. ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील तेव्हाच राज्यात हरित क्रांती झाली असे म्हणता येईल, असे ते म्हणाले.सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्‌ध्वस्त होत असते. अशा अनिश्‍चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही कामकाजाची सुरुवात पीक कर्ज मुक्तीपासून केली. यानंतर करोनाचे संकट आले. पण शेतकऱ्याने अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले त्याचे उपकार विसरता येणार नाही. आम्ही “विकेल ते पिकेल’ ही योजना घेऊन आलो आहे. या योजनेत जे पिकवीन ते विकल्या गेलेच पाहिजे असे ठरवले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Tags: Central Governmentchief MinisterfarmersGuhagarGuhagar NewsMaharashtraMahavikas Aghadi governmentMarathi NewsNews in Guhagarआघाडी सरकारउद्धव ठाकरेकेंद्र सरकारटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहाविकास आघाडी सरकारमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकलोकल न्युजहरित क्रांती
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.