• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?

by Ganesh Dhanawade
June 22, 2021
in Old News
16 0
0
मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची भूमिका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घ्या असं सांगणारं पत्र शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली. अखेर प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून रोखठेक भूमिका जाहीर केली आहे. प्रताप सरनाईक यांनी जे मोदींशी जुळवून घेण्याची भाषा केली आहे, त्यावर शिवसेनेचे मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे? असा सवाल केला आहे.
“पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘वाकडे-तिकडे’ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे?” असा सवाल करत तरीही ‘ विनाकारण त्रास ‘ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल, असा पवित्रा देखील शिवसेनेने घेतला आहे.
“केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय कामांसाठी वापर होत आहे,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Tags: chief MinisterGuhagarGuhagar NewsMarathi NewsMLA Pratap SaranaikNarendra ModiNews in GuhagarPM Narendra ModiPrime Minister Narendra ModiShiv Senaआयकरईडीउद्धव ठाकरेटॉप न्युजताज्या बातम्यापंतप्रधान नरेंद्र मोदीप्रताप सरनाईकमराठी बातम्यामुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरेलोकल न्युजशिवसेनासीबीआय
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.