• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरपंच जनतेतूनच !

by Ganesh Dhanawade
October 31, 2020
in Old News
16 0
0
सरपंच जनतेतूनच !
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाविकास आघाडी सरकारने घेतली माघार

मुंबई : भाजप सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. जनतेतून निवडून आलेले सरपंच बदलण्यासाठी सुरू असलेले लोकशाहीविरोधी प्रयत्न आपल्या अंगलट येत असल्याचे लक्षात येताच न्यायालयात तोंडघशी पडण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने याबाबत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विरळे-पळसवडेच्या सरपंच शारदा पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने हा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे याचिका गुरुवारीच निकालात निघाली आहे आणि सरपंच जनतेतूनच थेट निवडून येणार असल्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात २०१७ साली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांत सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार काही ठिकाणी सरपंचांच्या निवडी थेट जनतेतून करण्यात आल्या होत्या. तसेच सरपंचाला पदावरून दूर करण्याचे अधिकारही ग्रामसभेला देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम’ पुन्हा बदलला. त्यानुसार जुन्या पद्धतीनुसार सरपंच निवडले जाणार होते. सरपंचाला पदावरून दूर करण्यासाठीचे अधिकार ग्रामपंचायतीला, म्हणजेच सदस्यांना देण्यात आले. मात्र, न्यायतत्त्वानुसार फडणवीस सरकारने केलेल्या कायद्याखाली जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना आघाडी सरकारचा अधिनियम लागू होणार नव्हता. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या तरतुदीखाली निवडून आलेल्या सरपंचांना पदावरून दूर करण्याचे अधिकारही ग्रामसभेकडेच होते. परंतु, त्याकडे कानाडोळा करून ग्रामपंचायत सदस्य सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करू शकतात, तसेच त्यांनंतर सरपंचाला पायउतार व्हावे लागेल, अशा सूचना महाआघाडी सरकारच्या वतीने सर्व जिल्हाधिकार्‍यांना सप्टेंबर महिन्यात देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, सरपंच शारदा पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. त्याअनुरूप शारदा पाटील यांना पदावरून दूर करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून झाले. मात्र, शारदा पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारला आपली चूक लक्षात आली. फडणवीस सरकारच्या कायद्याखाली निवडून आलेल्या सरपंचांना महाआघाडी सरकारचा कायदा लागू होणार नाही, तसेच पदावरून दूर करण्याचे अधिकार ग्रामसभेकडेच असतील, हे सर्व जिल्हाधिकार्‍यांना बुधवारी दि. २८ रोजी नव्याने कळविण्यात आल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. फडणवीस सरकारच्या कायद्याखाली निवडून आलेले सरपंच फडणवीस सरकारच्याच कायद्यानुसार पाच वर्षांची टर्म पूर्ण करणार, हे आता निश्चित झाले आहे. फडणवीसांना शह देऊ इच्छिणार्‍या महाआघाडीलाच एकप्रकारे दणका बसला आहे.

Tags: BJPGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarउद्धव ठाकरेटॉप न्युजताज्या बातम्याभाजपमराठी बातम्यामहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेलोकल न्युजशारदा पाटील
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.