• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ई-पीक पाणीत ९४ हजार ४७ शेतकऱ्यांची नोंदणी

by Ganesh Dhanawade
October 19, 2021
in Old News
16 0
0
अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : पीक पेरा नोंदणीसाठी शासनाने ‘ई-पीक पाणी’ अ‍ॅप सुरू केले आहे. या अॅपवर जिल्ह्यातील ९४ हजार ०४७  शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. नेटवर्क, अ‍ॅंण्ड्रॉईड मोबाईल आदीची अडचण होती. मात्र त्यावर मात करून नोंदणीमध्ये ही प्रगती झाली आहे. ८७ हजार १०७ शेतकऱ्यांनी याचा प्रत्यक्ष वापर सुरू केला असून ६ हजार ९४५ शेतकरी वापर न करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना तलाठ्यांसह काही महसूल अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होत नाही. त्यासाठी त्यांना बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केला जाणार आहे. पळवाट काढणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे, त्या भागात थमद्वारे हजेरी लावणे अनिवार्य केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, शेतकरी घेत असलेली पिके, फळबाग, बांधावरची झाडे यांची ई-पीक अ‍ॅपवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन नोंद घेण्यात येत आहे. पारदर्शकतेसाठी हे अ‍ॅप शासनाकडून विकसित केले आहे. यावर पिकाची माहिती भरण्यापूर्वी सर्व्हे नंबरची माहिती काढून ठेवावी लागते. शेत जमिनीची अचूक जागा, गाव नमुना आठ अ, सात-बाराही आवश्यक असतो. शेतात मोकळ्या जागेत उभे राहून फोटो घेऊन अक्षांश व रेखांश घेतले जातात. कृषीसह महसूल विभागाकडून हे काम सुरू आहे. याला जिल्ह्यात कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र तो वाढविण्यात यश आले आहे. जिल्ह्यात २० लाख सात-बारांचे संगणकीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार ते शेतकऱ्यांना मोफत वाटप केले जात आहेत. डाऊनलोड केलेले सात-बारा ३ लाख आहेत. ६० हजार सातबारांची प्रिंट काढली असून १६ हजार ७२० डिझिटल सात-बारा उतारांचे वाटप करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात अजूनही नेटवर्कचा प्रश्न असल्याने डिजिटल सात-बारा मिळत नाही. तेथील तलाठ्यांकडे ग्रामस्थ फेऱ्या मारून थकतात. तरी तलाठी भेटत नाहीत, अशा तक्रारी आहेत. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आमच्याकडेही या तक्रारी आल्या आहेत. त्यावर लवकरच उपाययोजना केल्या जाणार आहेत. बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केली जाणार आहे. तलाठी किंवा अन्य अधिकारी पळवाट सांगत असले तर त्याला ज्या भागात आहे, तेथे थम लावण्यास सांगितले जाईल. त्यामुळे संबंधित तलाठी, अधिकारी कामावर हजर आहे की नाही हे स्पष्ट होईल.

Tags: ‘ई-पीक पाणी’'e-crop waterappGovernmentGuhagarGuhagar NewslaunchMarathi NewsNews in GuhagarRegistrationअ‍ॅंण्ड्रॉईड मोबाईलअ‍ॅपई-पीकजिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटीलटॉप न्युजतलाठीताज्या बातम्यानेटवर्कपत्रकार परिषदपीक पेरा नोंदणीमराठी बातम्यामहसूल अधिकारीलोकल न्युजसर्व्हे
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.