सलग ११ वेळा अध्यक्ष होण्याचा मान
गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा जि. प. केंद्र शाळा आबलोली नं.१ येथे नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या ग्रामसभेत विद्याधर राजाराम कदम ऊर्फ आप्पा कदम यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. कदम हे गेली अकराव्यांदा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद भूषवत आहेत.
Gram Sabha of Abloli Gram Panchayat in the taluka. Z.P Kendra School Abloli No. 1 recently concluded with enthusiasm. In this Gram Sabha, Vidyadhar Rajaram Kadam alias Appa Kadam was elected unopposed as the Chairman of the Dispute Resolution Committee. Kadam is the chairman of the Dispute Resolution Committee for the eleventh time.


विद्याधर कदम यांनी गेली अनेक वर्ष गावाच्या हितासाठी सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन कोणत्याहि प्रकारचे राजकारण होऊ न देता ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूकिची परंपरा कायम ठेवली. गावातील तंटे गावातच मिटवले. आणि कोरोना काळातहि गावासाठी योगदान दिले. अशाप्रकारे सक्रियपणे काम करणारे कदम हे आबलोलीच्या तंटामूक्ती अध्यक्षपदी रहावेत असा ठराव ग्रामसभेने संमत केला. त्याला सर्वांनीच टाळ्या वाजून पाठिंबा दिला. ग्रामपंचायत सरपंच तुकाराम पागडे यांचे हस्ते आप्पा कदम यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी ग्रामसेवक बाबूराव सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले , मिनल कदम, भारती कदम, मुग्धा पागडे, साक्षी रेपाळ, शाळा व्यवस्थापन कमीटी अध्यक्ष उल्हास काळे, उद्योजक सुभाष काजरोळकर, बाबा वैद्य, दत्ताराम कदम, उदय पवार, महेंद्र कदम, विद्याधर विठ्ठल कदम, योगेश भोसले, अमोल शिर्के, तलाठी शुभम जाधव, सुशांत कदम आदी उपस्थित होते.
तसेच कोरोना काळात गेली दोन वर्ष गावासाठी योगदान देणारे सरपंच तुकाराम पागडे , ग्रामसेवक बाबूराव सुर्यवंशी , पोलीस पाटिल महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामकृतीदल, अाशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदी व्यक्तींचा ग्रामसभेत सत्कार करण्यात आला. तर काहिंच्या अभिनंदनाचा ठरावहि करण्यात आला. आबलोली तलाठी पदी रुजू झालेले शुभम जाधव यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.