तालुक्यात आयसीआयसीआय बँकेची शाखाच नाही
गुहागर : केंद्र शासनाच्या(Central government) यावर्षी सुरू होत असलेल्या 15 वा वित्त आयोग निधीसाठी(Finance Commission Fund) सर्व ग्रामपंचायतीनी(Gram Panchayat) त्यासाठी आयसीआयसीआय बँकेतच(ICICI Bank) नव्याने खाते(Account) सुरू करावेत असे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशाला गुहागर तालुक्यातील सरपंच(Sarpanch) आणि ग्रामसेवक(GramSevak) यांनी विरोध केला असून एका बँकेच्या भल्यासाठी व त्यांना मिळणाऱ्या नफ्यासाठी इतरांची फरफट करणारा हा निर्णय(Decision) असून याला गुहागर तालुका सरपंच संघटनेने(Guhagar Taluka Sarpanch Association) विरोध केला असल्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष व पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे(Patpanhale Gram Panchayat) सरपंच संजय पवार(Sarpanch Sanjay Pawar) यांनी सांगितले.


यापूर्वी आलेल्या 14 व्या वित्त आयोगाचा निधी हा बँक ऑफ इंडिया(Bank of India) किंवा तत्सम राष्ट्रीयकृत बँकेत(Similar nationalized bank) खाते काढून ग्रामपंचायतींना मिळत असे. बँक ऑफ इंडिया गुहागर तालुक्याची शिखर बँक(Shikhar Bank) असून तिच्या तालुक्यात अनेक ठिकाणी शाखा आहेत. 15 वा वित्त आयोग(Finance Commission) लागू झाल्यापासून ग्रामविकासाची अनेक कामे हाती घेण्यात येत आहेत. मात्र, या वित्त आयोगाच्या निधीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने नव्याने आयसीआयसीआय बँकेमध्ये(ICICI Bank) खाते उघडण्याचे आदेश आला असून त्यानुसार ही खाती उघडली जात आहेत. परंतु, शासनाच्या निर्णयावर गुहागर तालुक्यातील सरपंचांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. गुहागर तालुक्यात एकही आयसीआयसीआय बँकेचे शाखा नसून खात्यातील या व्यवहारासाठी चिपळूण, खेड किंवा सावर्डे या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागणार आहेत. याबाबत गुहागर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले की, गुहागर तालुक्यात एकूण 63 ग्रामपंचायती असून यातील काही ग्रामपंचायतीचे खाती आयसीआयसीआय बँकेच्या खेड चिपळूण, सावर्डे अशा ठिकाणी काढण्यात आले आहेत. गुहागर तालुक्यात आयसीआयसीआय बँकेची एकही शाखा नाही. त्यामुळे गुहागर तालुक्यातील अनेक भागातील भातगाव, पडवे, तवसाळ, वेलदुरपर्यंतच्या या खात्याशी संबंधित असलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.