नगरपंचायत शोध लावणार का? भाजपचा सवाल
गुहागर, ता. 12 : शहरातील किर्तनवाडी रस्त्यावरील सभागृहाजवळ दररोज पाणी साचत आहे. सध्या गुहागर चिपळूण महामागार्च काम चालू असल्याने अनेक वाहने या मार्गाने जातात. त्यामुळे चिखलमिश्रीत पाण्यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. People suffer from puddles of water. कोणतीही जलवाहिनी फुटलेली नसताना आणि रस्त्यावर नळाचे पाणी येत नसताना हे पाणी कोठून येते असा प्रश्र्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. आज भाजपच्या शहरातील कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी जावून साचलेल्या पाण्याची तसेच तीन वर्षात दुरावस्था झालेल्या रस्त्याची पहाणी केली. यावेळी हे पाणी नक्की कोठून येते याचा शोध नगरपंचायत लावणार आहे. असा प्रश्र्न भाजप शहराध्यक्ष संगम मोरे यांनी उपस्थित केला आहे.


गुहागर शहरातील किर्तनवाडी रस्त्यावर सभागृह आहे. याठिकाणी रस्त्या खोलगट आहे. गेले काही दिवस या खोलगट भागात रोज पावसाळी डबक्यांप्रमाणे पाणी साचते. परिसरातील नागरिकांनी जलवाहिनी फुटली आहे का याचा शोध घेतला. मात्र जलवाहिनी फुटलेली कुठेच आढळून आली नाही. तसेच परिसरातील एखादा नळ खुला राहील्याने पाणी रस्त्यावर येते का याचाही शोध घेतला. मात्र तसेही लक्षात आले नाही. त्यामुळे पाऊस नसताना इतके पाणी इथे येते कसे. असा प्रश्र्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.People suffer from puddles of water
दरम्यान गुहागर चिपळूण रस्त्यावर महामार्गाचे काम वेगाने सुरु असल्याने अनेक दुचाकी चालक तसेच अन्य वाहने याच मार्गाने कोर्टापर्यंत जातात. त्यामुळे या मार्गावरील वहातूक वाढली आहे. परिणामी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढणे पादचाऱ्यांना कठीण झाले आहे. या परिसरातील अनेक नागरिक नोकरी, उद्योगासाठी, बाजारहाटासाठी याच मार्गाने चालत बाजारपेठेत येतात. पाणी साचलेले असल्याने पाय भिजू नयेत म्हणून मुली, महिला यांना कसरत करावी लागते. त्याचवेळी एखाद्या वाहनचालकाने नजरचुकीने वाहन वेगात नेले तर चिखलमिश्रीत पाणी अंगावर उडते. त्यामुळे साचलेल्या या पाण्याने परिसरातील नागरिक, महिला, मुली सर्वजण त्रासलेले आहेत. People suffer from puddles of water.
काही मंडळींनी गुहागर नगरपंचायतीमध्ये जावून साचलेल्या पाण्याची समस्या सांगितली. भाजप कार्यकर्त्यांना ही समस्या समजल्यावर तातडीने बुधवारी (ता. 12) भाजपचे शहराध्यक्ष संगम मोरे, गटनेते उमेश भोसले, नगरसेवक समिर घाणेकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष मंदार पालशेत आदींनी घटनास्थळाला भेट दिली. तेथील नागरिकांबरोबर चर्चा केली.
त्यानंतर गुहागर न्यूजशी बोलताना भाजपचे शहराध्यक्ष संगम मोरे म्हणाले की, पाण्याच्या डबक्यामुळे जनता त्रस्त आहे. ( People suffer from puddles of water ) शिवाय साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढते. त्यामुळे इथे पाणी कसे साचते. त्याला कोण कारणीभूत आहे. याचा शोध गुहागर नगरपंचायतीने घेण्याची आवश्यकता आहे. नगराध्यक्षांचा हा बालेकिल्ला आहे. उपनगराध्यक्ष देखील याच मार्गाने रोज ये-जा करतात. पाणी समितीच्या त्या सभापती आहेत. त्यामुळे तातडीने या विषयात लक्ष घालून नगरपंचायतीने या विषयाचा सोक्षमोक्ष लावावा आणि जनतेची त्रासातून मुक्तता करावी.
किर्तनवाडी रस्त्याची दुरावस्था
किर्तनवाडीचा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षात झाले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. याकडे भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी लक्ष वेधले. कोणत्याही रस्त्याचे काम करताना ठेकेदाराकडून सुरक्षा अनामत घेतली जाते. त्यामुळे नगरपंचायतीने ठेकेदाराकडून या रस्त्याची त्वरीत डागडूजी करुन घ्यावी. अशी मागणी यावेळी उमेश भोसले यांनी केली.