• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्रात नारळाच्या मागणीपैकी ५० टक्के उत्पादन

by Ganesh Dhanawade
September 23, 2021
in Old News
20 0
0
महाराष्ट्रात नारळाच्या मागणीपैकी ५० टक्के उत्पादन
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी- महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते; मात्र मागणी ९८ कोटी नारळ फळांची आहे. महाराष्ट्रात साधारणतः ५० टक्के उत्पादन होते. बाकीची मागणी इतर राज्याकडून आयात केली जाते. यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास राज्यातील नारळ क्षेत्र वाढले गेले पाहिजे, असे आवाहन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख व कृषिविदयवेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी केले.
भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील नारळ उत्पादक , शेतकरी व बागायतदार यांनी उत्स्फूर्त सहभाग लाभला.

डॉ. शिंदे यांनी नारळ लागवडीसाठी लागणारी जमीन, हवामान, जाती, रोपांची निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतर व मिश्र पिके, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कोकणातील नारळ लागवडीची सद्यःस्थिती व शेतकऱ्यांची पुढील वाटचाल कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन डॉ. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम सहायक चिन्मय साळवी यांनी केले. रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी आभार मानले.

Tags: agronomistcoconutsDr.Vaibhav ShindeGuhagarGuhagar NewsMaharashtra producesMarathi NewsNews in GuhagarproductionRegional Coconut Research Centerटॉप न्युजताज्या बातम्यानारळप्रादेशिक नारळ संशोधन केंद्रमराठी बातम्यामहाराष्ट्ररिलायन्स फाउंडेशनलोकल न्युज
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.