• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

केंद्राची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

by Ganesh Dhanawade
July 2, 2021
in Bharat
16 0
0
अपंगांना पदोन्नतीतील आरक्षण नाकारता येणार नाही
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवत पहिला धक्का दिल्यानंतर आज केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दुसरा झटका दिला आहे. १०२व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अर्थात SEBC मध्ये नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचा किंवा नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याच्या आपल्या आधीच्या भूमिकेवरच सर्वोच्च न्यायालय ठाम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा रद्दबातल ठरवत मराठा आरक्षणच रद्द केलं. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या तीव्र नाराजीचा सामना राज्य सरकारला सहन करावा लागला. राज्यघटनेच्या १०२व्या घटनादुरुस्तीनुसार एसईबीसीचे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा राज्य सरकारने केलेला कायदा रद्द ठरवला. आरक्षणाचं प्रमाण ५० टक्क्यांच्या वर जाण्याचा मुद्दा देखील या सुनावणीमध्ये महत्त्वाचा ठरला होता.
२०१८मध्ये करण्यात आलेल्या १०२व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये ३३८ ब हे कलम समाविष्ट करण्यात आलं. या कलमामध्ये राष्ट्रीय मागास आयोगाची रचना, कर्तव्य आणि अधिकार विषद करण्यात आले आहेत. तर कलम ३४२ अ मध्ये एखाद्या जातीला सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवण्याचा राष्ट्रवतींचा अधिकार आणि अशा जातींची यादी बदलण्याचा संसदेचा अधिकार याविषयी नमूद करण्यात आलं आहे.
“आम्ही केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका पाहिली. ५ मे रोजी देण्यात आलेल्या निकालाच्या विरोधात ही याचिका करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेले मुद्दे पुनर्विचार याचिका स्वीकारण्यासाठी पुरेसे नाहीत. यातल्या बहुतेक मुद्द्यांचा ५ जून रोजी दिलेल्या निकालामध्ये परामर्श घेण्यात आला आहे”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं. दरम्यान, याच प्रकरणात राज्य सरकारकडून देखील सर्वोच्च न्यायालया पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवलं होतं. त्यांच्या आंदोलनाच्या हाकेलाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. संभाजीराजे भोसले यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, विरोधी पक्ष नेत्यांशी आणि इतर पक्षीय नेत्यांशी देखील यासंदर्भात चर्चा केली असून राज्य सरकारला मराठा समाजाच्या वतीने काही मागण्या देखील सादर केल्या. या मागण्या कालबद्ध नियोजनानुसार पूर्ण करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांकडून त्यांना देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची याचिका फेटाळण्यात आल्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरू अलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarSEBCकेंद्र सरकारखासदार छत्रपती संभाजीराजे भोसलेटॉप न्युजताज्या बातम्याभाजपामराठा आरक्षणमराठी बातम्यामुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य सरकारलोकल न्युजसर्वोच्च न्यायालय
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.