अंगणवाडी सेविकांचे निवेदन, शासनाने मोबाईल दुरुस्त करावेत
गुहागर, ता. 22 : आयुक्तांनी कारवाईची दहशत निर्माण करुन मोबाईल परत घेण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे एस.टी. सुरू झाल्यानंतर हे मोबाईल परत घेऊ. असे निवेदन अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र, शाखा गुहागरच्या अध्यक्षा सौ. सारिका हळदणकर यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहे. (Mobile will be taken back due to fear of action)
आजची बातमी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणता येणार नाही
गुहागर तालुक्यातील 7 बीटमधील 185 अंगणवाडी सेविकांनी 26 ऑगस्टला शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात परत केले होते. मात्र 29 नोव्हेंबर 2021 ला राज्य पोषण संसाधनचे राज्य प्रकल्प संचालक रुबल अग्रवाल यांनी काढलेल्या परिपत्रक नुसार अंगणवाडी सेविकांवर कारवाईचा धाक दाखविण्यात आला. (Mobile will be taken back due to fear of action) त्यामुळे गुहागरमधील 185 अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल स्विकारण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील निवेदन सौ. सारिका हळदणकर यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, एस.टी. सुरु झाल्यावर अंगणवाडी सेविका मोबाईल परत घेण्यासाठी येतील. मात्र मराठी पोषण ट्रकर ॲप आल्याशिवाय आम्ही मोबाईलवर माहिती भरु शकणार नाही. नादुरुस्त मोबाईल शासनाने दुरुस्त करुन द्यावेत. यापुढे खाजगी मोबाईलवर आम्ही माहिती भरणार नाही. तशी सक्ती आपण करु नये. (Mobile will be taken back due to fear of action)
याबाबत सौ. हळदणकर म्हणाल्या की, शासनाने दिलेले मोबाईल चांगल्या प्रतीचे नाहीत. ते जुने व बाद झालेले आहेत. प्रत्येक वेळेला मोबाईल हँग होतो. बॅटरी खराब, कमी दर्जाची असल्याने गरम होते. बॅटरी फुटून अंगणवाडी सेविका जखमी झाल्यास त्यांची जबाबदारी शासन घेणार का याचे उत्तर अधिकारी देत नाहीत. ग्रामीण भागात कमी नेटवर्कमध्ये ॲपलिकेशन सुरु होत नाही. त्यामुळे काम करणे अवघड जाते. शासनाने आम्हाला जास्त रॅमचे, उच्च दर्जाचे मोबाईल द्यावेत. (Mobile will be taken back due to fear of action)