जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, न्यायालयीन कार्यवाही वेदनादायी
गुहागर, ता. 19 : नावेद – 2 या बोटीवरील सर्व खलाशांना शासनाने मृत म्हणून घोषित करावे. तरच शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा फायदा त्यांना देता येईल. मृताच्या जवळच्या नातेवाईकांनी न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर करणे. ही अत्यंत वेदनादायी कार्यवाही आहे. असे मत वेळणेश्र्वर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी Guhagar News जवळ बोलताना व्यक्त केले. The government should declare all the sailors on board Naved-2 as dead. After that sailors family get benefits from the government schemes. Submission of affidavit to the court by the next of kin of the deceased. This is a very painful procedure. This is the opinion of Zilla Parishad member of Velneshwar group Mrs. Netra Thakur expressed this while speaking with Guhagar News.


सौ. ठाकूर म्हणाल्या की, महापूर, दरड कोसळणे, सावित्रीसारखी दुर्दैवी घटना यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना शासनाकडून मदत दिली जाते. मात्र आमच्या मच्छीमार बांधवांचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला तर त्याला शासकीय नियमांमुळे ६ वर्ष मृत घोषित केले जात नाही. अशावेळी विमा रक्कम मिळत नाही. ६ वर्षांनंतर या लोकांच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे विम्यामधील गुंतवणूकीचा फायदा मच्छीमार समाजाला होत नाही. शासनाकडून मिळणारी, विम्याची रक्कम आयुष्याला पुरणारी नसली तरी अशा प्रसंगानंतर कुटुंब उभे रहायला उपयोगी पडते. मच्छीमारांच्या अनुभवाप्रमाणे समुद्रात पोहणारा कोणताही खलाशी 72 तासांत समुद्र किनाऱ्यावर येतो. हे लक्षात घेवून शासनाने संबंधित तपास यंत्रणेबरोबर चर्चा करुन मच्छीमारांना मृत घोषित करणे आवश्यक आहे. आज जे सहा खलाशी बेपत्ता झालेत या प्रत्येक कुटुंबात किमान 5 ते 6 व्यक्ती आहेत. एका कुटुंबात शाळेत शिकणाऱ्या तीन मुली आहेत. एका खलाशाच्या मुलाला कॅन्सर झाला आहे. अघटीत प्रसंगानंतर या अभागी कुटुंबांनी उभे कसे रहायचे.


नावेद 2 बोटीवरील एका खलाश्याचा मृतदेह सापडला. 1 मृतदेह यंत्रणेने समुद्रातून काढला नाही. आणखी 3 मृतदेहांपर्यंत यंत्रणा पोचू शकली नाही. याचा अर्थ नावेदवरील सर्व बेपत्ता खलाशी मृत पावले हे निश्चित आहे. या खलाशांचे मृत्यू प्रमाणपत्र हवे असेल तर न्यायालयात संबंधित मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाने प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. लिहून द्यायचे आहे की, सदर व्यक्ती मृत आहे. जीवंत आढळल्यास शासकीय व अन्य ठिकाणाहून मिळालेली लाभाची रक्कम मी परत करेन. हे सर्व वेदनादायी आहे. त्यामुळे शासनाने निकष बदलावेत. अशी मागणी मी केली आहे.


संबंधित बातमी
नावेद बोटीच्या अपहरणाची शक्यता
आजच्या बातम्या वाचा
निवोशीतील सुजल कुळे याने साकारलेला प्रतापगड किल्ला
“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत गुहागरचा केतन टाणकर