युवा महोत्सवामुळेच राजकारणात यशस्वी; मंत्री उदय सामंत
पक्ष हे काम करण्याचे माध्यम गुहागर, ता. 06 : राजकीय पक्ष हे काम करण्याचे माध्यम आहे. निवडणूका लागल्यावर राजकारण करु, एकमेकांचे कपडे फाडू. मात्र त्यानंतर विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे. गुहागर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी वारंवार गुहागरमध्ये येत राहीन. असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी केले. ते गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवात बोलत होते. A party is a means of working रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत आंगणेवाडीतील दौरा संपल्यावर रात्री उशिरा गुहागरमध्ये किनारा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. यावेळी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान यांच्यावतीने साहिल आरेकर व सिद्धेश आरेकर यांनी सत्कार केला. यावेळी प्रास्ताविक करताना साहिल आरेकर म्हणाले की, किनारा युवा महोत्सवाची प्रेरणा उदय सामंत यांच्या बहर युवा महोत्सवातून घेतली. तरुणांना सोबत घेवून जाणारा नेता म्हणून उदय सामंत यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच पहिल्या युवा महोत्सवाचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा होती. परंतु गेली तीन चार वर्ष गुहागरमध्ये कोणी नेते सहज येण्यास तयार नसायचे. आज मात्र चित्र बदलले. आमदार शेखर निकम आणि मंत्री उदय सामंत दोघेही किनारा युवा महोत्सवाला भेट देण्यासाठी आले. A party is a means...
Read moreDetails




