सर्व पर्यटन स्थळे निर्मनुष्य
पर्यटकांवर अवलंबून असलेल्यांची बिकट अवस्था
गुहागर : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या गुहागरात शाळा व महाविद्यालयाच्या परिक्षा संपल्यानंतर पर्यटक मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला सुमारे ६५०० पर्यटक येत असतात. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या जास्त असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे गुहागरातील पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, यावर्षीहि गुहागरच नव्हे तर राज्यातील सर्वच पर्यटन व्यवसायावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे गेला महिनाभर बंद असलेल्या तालुक्यातील हॉटेल, लॉज च घरगुती राहण्याच्या ठिकाणांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.
During the tourist season about 6500 tourists visit the taluka. Due to this increase in the number of tourists, tourism in Guhagar is booming, but this year too, the crisis Corona hit the tourism business hard.


निसर्गसौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची अोळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतो. वर्षातून नाताळ सुट्टी व ३१ डिसेंबरला गुहागर पर्यटकांनी फुल्ल होऊन जातो. तर एप्रिल महिन्यात मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर शाळ महाविद्यालयाच्या सुट्ट्यामुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक कोकणात धाव घेतात. तालुक्यातील हेदवी – नरवण गावात ६ हॉटेल, ४ एमटीडीसे निवासस्थाने वेळणेश्वरमध्ये निवासस्थाने ४, शृगारतळीत ६ हॉटेल, २ एमटीडीसी निवासस्थाने, २ परमिट बार, वेलदूर – अंजनवेल येथे ३ हॉटेल, ३ एमटीडीसी निवासस्थान, गुहागर शहरात २० हॉटेल, काही गावांसह तालुक्यात सुमारे ४५ हॉटेल, ३० एमटीडीसी निवासस्थाने व ५८ घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे. पूर्वी गृहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक गेल्यावर्षीचा कोरोना काळ वगळता आता सलग तीन दिवस वास्तव्य करु लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोयी सुविधामूळे शक्य झाले आहे.


गुहागर हे पर्यटकांसाठी सुरक्षित असल्याने कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असते. बहुचर्चित एरॉनचा दाभोळ पॉवर प्रकल्प बंद पडल्यानंतर बेरोजगारीचे मोठे संकट तालुक्यावर आले होते. अशा परिस्थितीत निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटनाने येथील जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यानंतर येथील नागरिकांना रोजगाराचा प्रश्ना म्हणावा तसा भेडसावत नाही. त्यामुळे हा तालुका आता एकंदरीतच पर्यटन व्यवसायावरच जास्त अवलंबून आहे.

