परिवार संवाद यात्रा : पक्षाची बांधणी करणारे पहिल्या रांगेतून गायब
गुहागर, ता. 29 : राष्ट्रवादीच्या (NCP) परिवार संवाद यात्रेमध्ये (Parivar Samvad Yatra) गुहागरकरांना तब्बल अडीच वर्षांनी सहदेव बेटकरांचे दर्शन झाले. Betkar seen in NCP Program at Guhagar, after two years. दापोलीतील पक्षप्रवेशकर्तेही पहिल्या रांगेत होते. परंतू विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election 2019) पक्षाची संघटनात्मक बांधणी करणारे गुहागरचे तालुकाध्यक्ष, गुहागरचे नगराध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते पहिल्या रांगेत कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके स्थान कोणाला. अशी चर्चा सध्या सुरु आहे.


गुहागरला परिवार संवाद यात्रेच्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत गुहागरातील कोणालाच स्थान नव्हते. याला अपवाद होता विधानसभा निवडणुकीतील उमेदवार सहदेव बेटकर यांचा. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये कुठेही न दिसणाऱ्या सहदेव बेटकर यांचे गुहागरातील कार्यकर्त्यांना प्रथमच दर्शन झाले. गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात गुहागरमधील प्रत्येक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची सभा झाली. प्रत्येक पंचायत समिती गणामधील कार्यकर्त्यांच्या बैठका तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतल्या. दरम्यानच्या काळात गुहागरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यामध्ये कुठेही न दिसलेले सहदेव बेटकर आज प्रथमच गुहागरमध्ये राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले. त्यांनी राष्ट्रवादीचा मफलर घेतला असल्याने सर्वांमध्ये ते उठून दिसत होते.


व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष (State President) व जलसंपदा मंत्री Maharashtra Cabinet Minister Water Resources) जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), आमदार शेखर निकम (MLA Shekhar Nikam), राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा (NCP Women’s State President) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), पक्ष निरिक्षक बबन कनावजे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम (EX MLA Sanjay Kadam) यांच्याबरोबर पहिल्या रांगेत नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले संदिप राजपुरे आणि शंकर कांगणे यांना जागा देण्यात आली होती. मात्र मुंबईत पक्षप्रवेश करणारे गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीचे निस्वार्थपणे काम करणारे पद्माकर आरेकर यांना पहिल्या रांगेत स्थान नव्हते. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत पडझड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मजबुत करण्यासाठी झटणारे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांना देखील पहिल्या रांगेत स्थान मिळाले नाही. नव्यांना मानाचे पान देताना जुन्यांना मागल्या ओळीत बसविण्यात आले. याची चर्चा सध्या गुहागरमध्ये सुरु आहे.
राष्ट्रवादीच्या कौटुंबिक कार्यक्रमात प्रदेश स्तरावरील मंडळी मार्गदर्शनासाठी आली होती. येथे मानपानाचा प्रश्र्नच येत नाही. मला स्वत:ला कुठे बसतो यापेक्षा काय काम करतो यामध्ये स्वारस्य आहे. त्यामुळे या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो. आपल्या तालुक्यात आलेल्या नेतेमंडळींचा सन्मान झाला. यात मी समाधानी आहे. पत्रकारांच्या संदर्भात जे घडले त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त केली आहे.
– राजेंद्र आरेकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष